युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

कार्तिक-गणेश कथा श्रवणाने भाविक मंत्रमुग्ध

 विवेक आणि विश्वासाचा समन्वय म्हणजे श्रीगणेश-प.पु.माता कनकेश्वरीदेवीजी




कार्तिक-गणेश कथा श्रवणाने भाविक मंत्रमुग्ध

परळी(प्रतिनिधी)

कुठल्याही देवाची पूजा अर्चा करतेवेळी माणसाचा विवेक जागृत असला पाहिजे विवेक व विश्वासाचे समन्वय म्हणजे श्री गणेश असून श्री गणेश व कार्तिकेय यांच्या जन्माची कथा या भगवान शंकराच्या लीला असल्याचे प्रतिपादन माता कनकेश्वरी देवीजी यांनी परळी येथील हलगी गार्डन येथे सुरू असलेल्या शिव महापुराण कथेत मंगळवारी केले.

 पंचम ज्योतिर्लिंग परळी येथील हालगे गार्डन येथे बुधवार दि.६ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत दररोज दुपारी ३ ते ६ या वेळेत सुरू असलेल्या शिवमहापुराण कथा ज्ञान यज्ञात मंगळवार दि.१२ नोव्हेंबर रोजी माता कनकेश्वरी देवीजी कथेचे सातवे पुष्प गुंफताना माता पार्वती व भगवान शंकराच्या कार्तिक व श्री गणेश या दोन्ही मुलांच्या जन्म कथा सांगितल्या. कुठलेही दास हे खास बनल्यावर त्यांच्यामध्ये स्पर्धा निर्माण होते ते आपल्या स्वामीच्या निर्णयाऐवजी स्वतः निर्णय घेऊ लागतात भगवान शंकराचे दास खास झाल्याने त्यांच्यामध्ये अहंकार निर्माण झाला होता यातूनच श्री गणेश जन्माची लीला भगवान शंकराने रचली. श्री गणेशाचा जन्म हा तीन कारणासाठी झाला यात माता पार्वतीने केलेले तप, सर्व शिष्यामध्ये आलेला अहंकार व माता पार्वतीची काली-गौरी ही रुपे कारणीभूत आहेत.श्रीगणेश विवेक व विश्वासाचा समन्वय होय.कुठल्याही भक्ताने सेवाधर्म सोडु नये. माणसाला प्रशंसा हवीहवीशी वाटू लागली की सेवा धर्मात चुका होतात साधनांमध्ये जेव्हा निष्ठा शक्ती येत असते तेव्हा त्याला कोणीच जाग्यावरून हलवू शकत नाही परंतु खास बनवण्याच्या नादात भक्तामध्ये अहंकार निर्माण होतो आणि यातूनच स्पर्धा निर्माण होत असल्याचे सांगितले श्री गणेश व कार्तिक यांच्या लग्नाबद्दलची कथा सविस्तरपणे सांगितले. रिद्धी व सिद्धी या केवळ नावे नसून रिद्धी म्हणजे भौतिक सुखातील संपत्ती तर सिद्धी म्हणजे समता कडे असलेली विवेक संपत्ती होय.

@@@@@

 आज सांगता

बुधवार दि.६  नोव्हेंबर पासून परळी येथील हालगे गार्डन येथे सौ.जयश्रीताई प्रभु कोरे हिंपळनेकर,लातुर व पंचम ज्योतिर्लिंग प्रभु वैद्यनाथ शिवकथा समिती,परळी वैजनाथ यांच्या आयोजनाखाली सुरू असलेल्या प.पु.माता कनकेश्वरी देवीजी यांच्या शिवमहापुराण कथेची बुधवार दि.१३ नोव्हेंबर रोजी सांगता होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या