मोठ्या संख्येने उपस्थित रहा....

इमेज
द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आज आयोजन परळी वैजनाथ | प्रतिनिधी द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालय, परळी वैजनाथ यांच्या वतीने २० वे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे स्नेहसंमेलन आज  बुधवार, दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे  नटराज रंग मंदिर, परळी वैजनाथ येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामलिंग राजनळे सर (माजी मुख्याध्यापक, वैद्यनाथ विद्यालय) राहणार असून उद्घाटन  गणेश गिरी (गटशिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्र, परळी वै.) यांच्या हस्ते होणार आहे. या काकार्यक्रमास बाजीराव  भैय्या   धर्माधिकारी (माजी नगराध्यक्ष),  कोकणे  (विस्ताराधिकारी),  धनंजय ढोणे  (पोलीस निरीक्षक),  दिवाकर जोशी (गझलकार), प्रा. रविंद्र जोशी सर (पत्रकार,  दैनिक पुढारी),  व्यंकटेश शिंदे (नगरसेवक) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.           स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे नृत...

जिल्ह्याच्या विकासाचा सूर्य मावळू देऊ नका -पंकजा मुंडे

जिल्ह्याच्या विकासाचा सूर्य मावळू देऊ नका -पंकजा मुंडे 

अंबाजोगाई।दिनांक १२।

माझा जिल्हा पुरोगामी, सुशिक्षित आणि चांगल्या माणसाच्या पाठिशी उभा राहणारा जिल्हा आहे. त्यामुळे या निवडणूकीत तुम्हाला विकासाची दृष्टी समोर ठेवून मतदान करायचे आहे. जिल्हयाच्या विकासाचा सूर्य कधीच मावळू देऊ नका असे आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजा मुंडे यांनी केलं.

        अंबाजोगाईत आज केंद्रीय मंत्री नितिन गडकरी व आ. पंकजा मुंडे यांची संयुक्त सभा झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. माजी खासदार डॉ.प्रीतम मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

  अंबाजोगाईची मी नात असल्याने या शहराशी माझा ऋणानुबंध आहे. हा जिल्हा मुंडे-महाजनांच्या तालमीत वाढलेला जिल्हा आहे. मुंडे साहेबानी एकेक माणूस जोडून ठेवला आहे. या जिल्ह्याने १९८० पासून कमळाचं फुल सोडलेलं नाही. पालकमंत्री असतांना जिल्हयासाठी खूप चांगल काम केल. सर्व घटकांचा समान विकास करण्याचा प्रयत्न केला. लोकसभेत माझा पराभव झाला पण तो पराभव मी आता विसरले आहे. मी मतांनी हरले पण मनाने हरले नाही आणि पुन्हा कामाला लागले. मी महाराष्ट्रातचं रहाव, दिल्लीत जावू नये अशी तुमचीच इच्छा होती म्हणून विधानपरिषदेची आमदार झाले.मी आता कोण्या एका मतदारसंघाची आमदार नाही तर पूर्ण जिल्हयाची आमदार आहे, त्यामुळे आता पुन्हा नव्या जोमाने कामाला लागले आहे.

विकासाचा सूर्य मावळू देऊ नका

महाराष्ट्रात पुन्हा भाजपा महायुतीचे सरकार सत्तेवर आले  तरच जिल्ह्याचा विकास साधता येईल. फेक नरेटिव्ह पूर्णपणे नेस्तनाबूत करा.विकासाचा सूर्य कधीच मावळू देऊ नका,  असं आवाहन आ. पंकजाताईंनी यावेळी केलं.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....