इमेज
  दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी दिपक गोविंद गित्ते  इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो येथे सिलेक्शन  परळी ( प्रतिनिधी) दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी चिरंजीव दीपक गोविंदराव गित्ते यांची मध्यप्रदेश भोपाल येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो या खेळामध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल शाळेचे प्रेरणास्थान मार्गदर्शक मा. श्री .किरण गित्ते साहेब IAS सचिव : सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, उद्योग व वाणिज्य विभाग त्रिपुरा सरकार,  विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्षा : सौ.उषाताई किरण गित्ते , शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. श्रीकांत पाटील सर यांनी गोविंद गित्ते कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .  या स्पर्धा मध्य प्रदेश भोपाल येथे इंटरनॅशनल या स्पर्धा दिनांक 12 मे 2026 रोजी होणार आहेत.           मराठवाड्यातील  नामांकित दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलने आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना खेळामध्ये महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले असून आता दीपक गोविंदराव गित्ते या विद्यार्थ्य...

जिल्ह्याच्या विकासाचा सूर्य मावळू देऊ नका -पंकजा मुंडे

जिल्ह्याच्या विकासाचा सूर्य मावळू देऊ नका -पंकजा मुंडे 

अंबाजोगाई।दिनांक १२।

माझा जिल्हा पुरोगामी, सुशिक्षित आणि चांगल्या माणसाच्या पाठिशी उभा राहणारा जिल्हा आहे. त्यामुळे या निवडणूकीत तुम्हाला विकासाची दृष्टी समोर ठेवून मतदान करायचे आहे. जिल्हयाच्या विकासाचा सूर्य कधीच मावळू देऊ नका असे आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजा मुंडे यांनी केलं.

        अंबाजोगाईत आज केंद्रीय मंत्री नितिन गडकरी व आ. पंकजा मुंडे यांची संयुक्त सभा झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. माजी खासदार डॉ.प्रीतम मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

  अंबाजोगाईची मी नात असल्याने या शहराशी माझा ऋणानुबंध आहे. हा जिल्हा मुंडे-महाजनांच्या तालमीत वाढलेला जिल्हा आहे. मुंडे साहेबानी एकेक माणूस जोडून ठेवला आहे. या जिल्ह्याने १९८० पासून कमळाचं फुल सोडलेलं नाही. पालकमंत्री असतांना जिल्हयासाठी खूप चांगल काम केल. सर्व घटकांचा समान विकास करण्याचा प्रयत्न केला. लोकसभेत माझा पराभव झाला पण तो पराभव मी आता विसरले आहे. मी मतांनी हरले पण मनाने हरले नाही आणि पुन्हा कामाला लागले. मी महाराष्ट्रातचं रहाव, दिल्लीत जावू नये अशी तुमचीच इच्छा होती म्हणून विधानपरिषदेची आमदार झाले.मी आता कोण्या एका मतदारसंघाची आमदार नाही तर पूर्ण जिल्हयाची आमदार आहे, त्यामुळे आता पुन्हा नव्या जोमाने कामाला लागले आहे.

विकासाचा सूर्य मावळू देऊ नका

महाराष्ट्रात पुन्हा भाजपा महायुतीचे सरकार सत्तेवर आले  तरच जिल्ह्याचा विकास साधता येईल. फेक नरेटिव्ह पूर्णपणे नेस्तनाबूत करा.विकासाचा सूर्य कधीच मावळू देऊ नका,  असं आवाहन आ. पंकजाताईंनी यावेळी केलं.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....