परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

जिल्ह्याच्या विकासाचा सूर्य मावळू देऊ नका -पंकजा मुंडे

जिल्ह्याच्या विकासाचा सूर्य मावळू देऊ नका -पंकजा मुंडे 

अंबाजोगाई।दिनांक १२।

माझा जिल्हा पुरोगामी, सुशिक्षित आणि चांगल्या माणसाच्या पाठिशी उभा राहणारा जिल्हा आहे. त्यामुळे या निवडणूकीत तुम्हाला विकासाची दृष्टी समोर ठेवून मतदान करायचे आहे. जिल्हयाच्या विकासाचा सूर्य कधीच मावळू देऊ नका असे आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजा मुंडे यांनी केलं.

        अंबाजोगाईत आज केंद्रीय मंत्री नितिन गडकरी व आ. पंकजा मुंडे यांची संयुक्त सभा झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. माजी खासदार डॉ.प्रीतम मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

  अंबाजोगाईची मी नात असल्याने या शहराशी माझा ऋणानुबंध आहे. हा जिल्हा मुंडे-महाजनांच्या तालमीत वाढलेला जिल्हा आहे. मुंडे साहेबानी एकेक माणूस जोडून ठेवला आहे. या जिल्ह्याने १९८० पासून कमळाचं फुल सोडलेलं नाही. पालकमंत्री असतांना जिल्हयासाठी खूप चांगल काम केल. सर्व घटकांचा समान विकास करण्याचा प्रयत्न केला. लोकसभेत माझा पराभव झाला पण तो पराभव मी आता विसरले आहे. मी मतांनी हरले पण मनाने हरले नाही आणि पुन्हा कामाला लागले. मी महाराष्ट्रातचं रहाव, दिल्लीत जावू नये अशी तुमचीच इच्छा होती म्हणून विधानपरिषदेची आमदार झाले.मी आता कोण्या एका मतदारसंघाची आमदार नाही तर पूर्ण जिल्हयाची आमदार आहे, त्यामुळे आता पुन्हा नव्या जोमाने कामाला लागले आहे.

विकासाचा सूर्य मावळू देऊ नका

महाराष्ट्रात पुन्हा भाजपा महायुतीचे सरकार सत्तेवर आले  तरच जिल्ह्याचा विकास साधता येईल. फेक नरेटिव्ह पूर्णपणे नेस्तनाबूत करा.विकासाचा सूर्य कधीच मावळू देऊ नका,  असं आवाहन आ. पंकजाताईंनी यावेळी केलं.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!