प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

बीड:भाजपा सोडलेल्या लक्ष्मण पवारांनी घेतली फडणवीसांची भेट..


बीड( प्रतिनिधी) जिल्ह्याच्या पालकमंत्र्यावर आरोप करणारे गेवराईचे भाजपकडून दोन टर्म आमदार राहीलेले लक्ष्मण पवार यांनी अपक्ष निवडणूक लढविली.निवडणूक प्रचारात जिंकल्यावर पून्हा भाजपात जाणार नाही असे ठणकावून सांगणा-या लक्ष्मण पवारांनी थेट मुंबई गाठुन सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट घेतली आहे. यामुळे पवारांच्या राजकीय पुनर्वसनाची चर्चा मतदार संघात होत आहे.लक्ष्मण पवारांनी भाजपकडून गेवराई विधानसभेची दोन टर्म निवडणूक लढविली होती. २०१४ पंचवार्षिक निवडणुकीत त्यांनी निवडणुकीत राष्ट्रवादीचे बदामराव पंडित यांचा पराभव केला. तर २०१९ झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे विजयसिंह पंडित यांचा त्यांनी पराभव केला.

गेवराई विधानसभा मतदार संघातून दोन वेळा आमदार राहिलेल्या पवारांनी बीडच्या भाजप श्रेष्ठीवर तसेच पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रोष व्यक्त केला. यामुळे यंदाची निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले. पुन्हा कार्यकर्ते यांच्या आग्रहाखातर अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.


मात्र, त्यांचा या निवडणुकीत दारूण पराभव तर झालाच शिवाय डिपॉझिट देखील वाचू शकले नाही. त्यानंतर त्यांची राजकीय भूमिका काय असणार? याकडे लक्ष लागले असतानाचा मंगळवारी लक्ष्मण पवार यांनी थेट मुंबई गाठुन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने मतदाराबरोबरच तालुक्यातील जनता संभ्रमात पडली आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर लक्ष्मण पवार यांचे राजकीय पुनर्वसन की अन्य जबाबदारी मिळणार याची उत्सुकता तालुक्यातील जनतेला लागलेली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या