इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

 संस्कृती विसरल्यामुळे विकृती वाढते - प्रशांत महाराज खानापूरकर

अंबाजोगाई (वसुदेव शिंदे)

      सद्यःस्थितीत  तरुण पिढी आणि समाजातील अनेक घटक संस्कृती विसरत आहे आणि संस्कृती विसरल्यामुळे विकृती वाढत आहे .असे प्रतिपादन प्रशांत महाराज खानापूरकर यांनी केले.

 बिड जिल्ह्यातील व अंबाजोगाई तालुक्यातील माकेगाव येथे दक्षिण मुखी दत्त मंदिर संस्थान द्वारा आयोजित केलेल्या  भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहातील काल्याच्या कीर्तनात श्री संत तुकाराम महाराज यांच्या *दीन  आणि दुर्बलासी / सुखरासी हरी कथा* //  या अभंगावर त्यांनी निरूपण केले. पुढे बोलताना ते म्हणाले की ,समाजामध्ये तरुण पिढी ही अतिशय वाम मार्गाला जात आहे. व्यसनाच्या अहारी गेलेली पिढी समाजात विकृत कृत्य  करत आहेत. या तरुण पिढीला आवरणे अवरून त्यांना सावरणे आणि त्यांचे प्रबोधन करणे अत्यंत आवश्यक आहे . सध्या तरुण पिढीमध्ये गुन्हेगारी खूप प्रमाणात वाढत आहे याला कारण फिल्मी इंडस्ट्री मध्ये होणारे विकृत दर्शन आणि समाजाने विकृतीला दिलेला आश्रय यामुळे ही तरुण पिढी बर्बाद होत आहे. विकृती पेक्षा संस्कृती शिकवली पाहिजे. संस्कार, धर्म, न्याय,नीती याविषयी उद्बोधन करणे अत्यंत आवश्यक आहे. संस्कृती टिकली तर समाजातील विकृती कमी होईल आणि अशांत झालेल्या समाज शांत होऊन गुण्यागोविंदाने नांदेल. असे प्रतिपादन प्रशांत महाराज यांनी केले. या कार्यक्रमाला माकेगाव आणि पंचक्रोशीतील हजारो भाविकांची उपस्थिती होती. काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसाद होऊन या कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाला श्री राजेसाहेब देशमुख ,दगडूसाहेब देशमुख आऊभैया देशमुख, व्यंकट देशमुख , दादासाहेब देशमुख,सरपंच  , उपसरपंच,यांच्यासह परिसरातील व गावातील किर्तनकार , गायक, वादक,प्रतिष्ठित नागरिक भाविक भक्त उपस्थित होते. प्रशांत महाराजांच्या या सुंदर सुश्राव्य कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध झाले.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या