दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

पशुसंवर्धन विभागातील योजनांना गती देणार --------

 ना.पंकजाताई मुंडे 'इज इन ॲक्शन'; मंत्रिपदाची जबाबदारी येताच विभागाच्या अधिकाऱ्यांची घेतली आढावा बैठक


पर्यावरण व वातारणीय बदलाबांबतच्या योजना राबविण्याबाबत सुनियोजित आराखडा तयार करण्याचे दिले निर्देश


 मुंबई,।दिनांक २४।

पर्यावरण व वातारणीय बदल या विभागातील राबविण्यात येणा-या योजना,भविष्यातील ध्येय धोरणे,घनकचरा व्यवस्थापन,माझी वसुंधरा अभियान,पाणी,हवा प्रदुषण,नदी व तलाव संवर्धन, पर्यावरण जतन व संवर्धन जनजागृती उपक्रमां विषयी सुनियोजित आराखडा तयार करण्याच्या सूचना राज्याच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी विभागांचा आढावा घेताना दिल्या.


   खातेवाटप झाल्यानंतर मंत्रिपदाची जबाबदारी येताच ना. पंकजाताई मुंडे यांनी आज सहयाद्री अतिथीगृहात पर्यावरण आणि पशुसंवर्धन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी बोलतांना त्या  म्हणाल्या की,राज्यातील घनकचरा व्यवस्थापन,पाणी,हवा प्रदूषण नियंत्रण,नदी व तलाव संवर्धन,पर्यावरण जतन व  संवर्धन जनजागृतीपर उपक्रम,राज्यस्तरीय नदी संवर्धन योजना,सागर तटीय विशेष राखीव क्षेत्र नियमन,स्थानिक स्वराज्य संस्थाचे घनकचरा व्यवस्थापन,प्लॅस्टीक निर्मुलन,राज्य नदी संवर्धन योजना,महाराष्ट्र पर्यावरण माहिती प्रणाली केंद्र,सृष्टी मित्र पुरस्कार,माझी वंसुधरा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणे,पर्यावरणपूरक वातावरणासाठी मार्गदर्शक तत्वे तयार करणे,जैविक कचरा नियमावली,पर्यावरण  जतन व संवर्धनासाठी राज्य, जिल्हा व ग्रामपातळीवर समित्या कार्यरत करणे, पर्यावरण क्लब स्थापन करणे.पाणथळ जागांचे संवर्धन यासाठी विशेष प्रयत्न करणे याबाबत सविस्तर नियोजन करा.त्यानुसार राज्यातील पर्यावरण विभागातील कामांना गती देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील असेही त्या म्हणाल्या.


पशुसंवर्धन विभागातील योजनांना गती देणार

--------

राज्यातील पशुसंवर्धन विभागाचाही यावेळी त्यांनी आढावा घेतला.विभागाची स्थापना आणि वाटचाल विभागाची ध्येय धोरणे,राज्यातील पशुधन,राज्य व केंद्र पुरस्कृत योजना,एकात्मिक सर्वेक्षण योजना  पशुगणना,जिल्हा वार्षिक योजना,विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प,पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ यासह राज्यातील पशुसंवर्धन विभागातील योजनांना गती देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे मंत्री पकंजा मुडे यांनी यावेळी सांगितले.


 यावेळी बैठकीला महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिध्देश कदम,पशुसंवर्धन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार,पर्यावरण  व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे यासह इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.


   यावेळी उपस्थित अधिकारी यांनी विभागाच्या योजना,सद्यस्थिती व भविष्यातील नियोजन याबाबत सविस्तर माहितीचे सादरीकरण केले.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....