इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

पशुसंवर्धन विभागातील योजनांना गती देणार --------

 ना.पंकजाताई मुंडे 'इज इन ॲक्शन'; मंत्रिपदाची जबाबदारी येताच विभागाच्या अधिकाऱ्यांची घेतली आढावा बैठक


पर्यावरण व वातारणीय बदलाबांबतच्या योजना राबविण्याबाबत सुनियोजित आराखडा तयार करण्याचे दिले निर्देश


 मुंबई,।दिनांक २४।

पर्यावरण व वातारणीय बदल या विभागातील राबविण्यात येणा-या योजना,भविष्यातील ध्येय धोरणे,घनकचरा व्यवस्थापन,माझी वसुंधरा अभियान,पाणी,हवा प्रदुषण,नदी व तलाव संवर्धन, पर्यावरण जतन व संवर्धन जनजागृती उपक्रमां विषयी सुनियोजित आराखडा तयार करण्याच्या सूचना राज्याच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी विभागांचा आढावा घेताना दिल्या.


   खातेवाटप झाल्यानंतर मंत्रिपदाची जबाबदारी येताच ना. पंकजाताई मुंडे यांनी आज सहयाद्री अतिथीगृहात पर्यावरण आणि पशुसंवर्धन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी बोलतांना त्या  म्हणाल्या की,राज्यातील घनकचरा व्यवस्थापन,पाणी,हवा प्रदूषण नियंत्रण,नदी व तलाव संवर्धन,पर्यावरण जतन व  संवर्धन जनजागृतीपर उपक्रम,राज्यस्तरीय नदी संवर्धन योजना,सागर तटीय विशेष राखीव क्षेत्र नियमन,स्थानिक स्वराज्य संस्थाचे घनकचरा व्यवस्थापन,प्लॅस्टीक निर्मुलन,राज्य नदी संवर्धन योजना,महाराष्ट्र पर्यावरण माहिती प्रणाली केंद्र,सृष्टी मित्र पुरस्कार,माझी वंसुधरा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणे,पर्यावरणपूरक वातावरणासाठी मार्गदर्शक तत्वे तयार करणे,जैविक कचरा नियमावली,पर्यावरण  जतन व संवर्धनासाठी राज्य, जिल्हा व ग्रामपातळीवर समित्या कार्यरत करणे, पर्यावरण क्लब स्थापन करणे.पाणथळ जागांचे संवर्धन यासाठी विशेष प्रयत्न करणे याबाबत सविस्तर नियोजन करा.त्यानुसार राज्यातील पर्यावरण विभागातील कामांना गती देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील असेही त्या म्हणाल्या.


पशुसंवर्धन विभागातील योजनांना गती देणार

--------

राज्यातील पशुसंवर्धन विभागाचाही यावेळी त्यांनी आढावा घेतला.विभागाची स्थापना आणि वाटचाल विभागाची ध्येय धोरणे,राज्यातील पशुधन,राज्य व केंद्र पुरस्कृत योजना,एकात्मिक सर्वेक्षण योजना  पशुगणना,जिल्हा वार्षिक योजना,विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प,पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ यासह राज्यातील पशुसंवर्धन विभागातील योजनांना गती देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे मंत्री पकंजा मुडे यांनी यावेळी सांगितले.


 यावेळी बैठकीला महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिध्देश कदम,पशुसंवर्धन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार,पर्यावरण  व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे यासह इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.


   यावेळी उपस्थित अधिकारी यांनी विभागाच्या योजना,सद्यस्थिती व भविष्यातील नियोजन याबाबत सविस्तर माहितीचे सादरीकरण केले.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या