प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

शिर्षस्थ नेत्यांचा संदेश प्राप्त होताच सर्व स्पष्ट होणार!

उद्या कोण-कोण शपथ घेणार? भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी स्पष्टच सांगितलं!

गेल्या अनेक दिवसांपासून असलेला सत्ता स्थापनेचा तिढा अखेर शेवटच्या क्षणी सुटला आहे. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहेत. तर, दोन उपमुख्यमंत्रीही राज्याला लाभणार आहेत. दरम्यान, उद्याच्या शपथविधीला कोण कोण शपथ घेणार, कोणाच्या पारड्यात कोणतं खातं पडणार याचीही उत्सुकता राज्यातील जनतेला आहे. यावरून भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते एका वृत्तवाहिनीवर बोलत होते.

२० नोव्हेंबरला मतदान होऊन २३ नोव्हेंबरला राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. या निकालानुसार महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. भाजपाला १३२ जागा, शिवसेना (एकनाथ शिंदे) ५५ जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ४० जागा मिळाल्याने महायुतीच राज्यात सत्ता स्थापन करणार हे स्पष्ट झालं होतं. परंतु, मुख्यमंत्री पदावरून राज्यात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या पदासाठी अडून बसले होते, अशी चर्चा होती. त्यामुळे सत्ता स्थापनेचा तिढा निर्माण झाला होता. अखेर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेतली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान, आज भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावाला सर्वांनी अनुमोदन दिलं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी नियुक्ती झाली. तसंच, तेच आता मुख्यमंत्री असणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. उद्याच्या शपथविधीला ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. तसंच, देवेंद्र फडणवीसांसह कोण कोण शपथ घेणार याचीही उत्सुकता आहे.

याबाबत सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “कोणी शपथ घ्यावी याबाबत राष्ट्रीय पातळीवर चर्चा केली जाईल, त्यानंतर संदेश आल्यावर शपथ घेतली जाईल. सध्या जे वातावरण आहे त्यानुसार मुख्यमंत्री आणि २ उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी उद्या होईल. १६ डिसेंबरपासून नागपूरचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्याआधी इतर मंत्र्यांचा शपथविधी कार्यक्रम होईल.

उद्याच सर्वांचा शपथविधी व्हावा अशी आमदारांमध्ये चर्चा

शपथविधीच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत येणार आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोरच आमदारांचा मंत्रिपदाचा शपथविधी सोहळा व्हायला हवा अशी चर्चा आहे. त्यावर सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “२८ नोव्हेंबर २०१९ मध्येही असाच शपथविधी झाला होता. त्यावेळीही फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीच शपथ घेतली होती.”

एकनाथ शिंदे नाराज आहेत का?

महायुतीच्या निर्णयावर एकनाथ शिंदे नाराज आहेत का? असाही प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “ते फार आनंदी आहेत. ते कधीच नाराज होत नाही. जो माणूस आपल्या कपाळ्यावर टीळा लावतो तो कधीच नाराज होऊ शकत नाही.”




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या