प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

महाराष्ट्र भाजपचे मुंडे - महाजन ते देवेंद्र पर्व

 महाराष्ट्र भाजपचे मुंडे - महाजन ते देवेंद्र पर्व !


1999 साली कॉंग्रेसमधे उभी फुट पडुन झालेली राष्ट्रवादी कॉंग्रेस ची पहिली निवडणुक झाली. सत्तेत असलेल्या युती सरकार ला बहुमतासाठी काही जागा कमी होत्या. 12 अपक्ष आमदार तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या सोबत होते. गोपीनाथरावांना मुख्यमंत्री पद दिले तर राष्ट्रवादी पक्ष देखील पाठिंबा देणार अशा चर्चा सुरू होत्या. “शरद पवारांची अभद्र युती कडे वाटचाल “ अशी दै.लोकमत ची हेडलाईन त्यावेळेस होती.मात्र, बाळासाहेब ठाकरे मात्र दुराग्रह सोडायला तयार नाहीत. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार नाहीतर विरोधी पक्षात बसू अशी जाहीर भूमिका.मुंडे- महाजन - पवार यांची शिष्टाई अयशस्वी झाली.

शिवसेना-६९, भाजप -५६

कॉग्रेस-७५, एनसीपी-५८

अपक्ष-१२ व बाकी इतर.

असं गणित असुनही ठाकरी बाण्यामुळे युती ला विरोधी पक्षात बसायची वेळ आली.सामना मधून गोपीनाथ मुंडेंवर आडून आडून कधी ऊघड ऊघड टिका केली गेली. मुंडे मुख्यमंत्री होऊ शकतात हे शिवसेनेला कधीच मान्य नव्हते. 2014 साली केंद्रात मोदी सरकार विराजमान झाल्यानंतर देखील मुंडे मुख्यमंत्री होऊ शकतात या चर्चेवर शिवसेनेने टिका केलेली,जाहीर उपहास केला.


साल 2024 - 1999 साली कॉंग्रेस राष्ट्रवादी यांची एकत्रित ताकत जितकी होती तितकं संख्याबळ आज एकट्या भाजप चं आहे. आणि गोपीनाथ मुंडेंच्या मार्गावर त्यांच्या समक्ष सुरुवात केलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील सर्वाधिक कसोटीची निवडणूक लिलया जिंकली आहे. मराठा विरुद्ध ओबीसी अशी ऊभी फुट त्यातच लोकसभा निवडणुकांचा पराभव गाठीशी असताना  ब्राम्हण या अकारण तिरस्कृत अल्पसंख्य वर्गाचे फडणवीस यांनी केंद्रीय व राज्यातील नेत्यांसह केलेली चाणाक्ष मांडणी विजयाचं अशक्य कोडं सोडवणारी ठरली.


जागोजागी उमेदवार निवडी , मित्र पक्षांसोबत समन्वय, पंकजा मुंडे सारख्या महत्त्वाच्या ओबीसी नेत्यांवर विश्वास ठेवून मराठवाड्यात घेतलेल्या फक्त दोन सभा यातून देवेंद्र फडणवीस यांचा अभ्यास व ग्राऊंड रिपोर्ट यंत्रणा यांचा अंदाज येतो.

         ओबीसी बिगर मराठा मते महायुतीच्या मराठा उमेदवारांना पडली हे लोकसभा निवडणुकीत न साधलेले गणित विधानसभेत साधलं. निकाल दणदणीत असले तरी ते अनपेक्षित नाहीत.निकाल मध्य प्रदेश सारखे असले तरी देवेंद्र फडणवीसांना शिवराजसिंहांसारखं डावलणं शक्य नाही.


देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत असताना ज्या अग्निपरीक्षा मधून तावून सुलाखून निघाले आहेत त्यातून त्यांना ही तिसरी संधी विक्रमी तर ठरणार आहे पण ही एक्या नव्या अध्यायाची सुरुवात देखील ठरु शकेल असं मंत्रीमंडळ व राज्यकारभार ते करुन दाखवतील हा भाजपप्रेमींना ठाम विश्वास आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या