परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

मुख्यमंत्रीपदी पुन्हा देवेंद्र फडणवीसांची घोषणा होताच मनोज जरांगे यांची पहिली प्रतिक्रिया काय ?


राज्यासह देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा पेच आज अखेर सुटल्याचं चित्र आहे. महायुतीतील भाजपने आज मुख्यमंत्रीपदासाठीचं नाव जाहीर झालं आहे. आज भाजपने अखेर मुख्यमंत्री पदाचं आणि विधीमंडळाच्या नेतेपदी एकमताने देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. त्यामुळे आता शपथविधीचा काऊंटडाऊन सुरू झाला आहे. उद्या (गुरूवारी) 5 डिसेंबर रोजी फडणवीस यांचा आझाद मैदानावर मुख्यमंत्र्यांचा आणि इतर मंत्र्यांच्या शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस काम पाहतील.आता राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर पुन्हा देवेंद्र फडणवीसांची नावाची घोषणा होताच मनोज जरांगे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत बोलताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेत होते म्हणून आम्ही त्यांचा विरोध केला. सत्तेत असतो त्याच्याशीच भांडावं लागतं. सरकार म्हणून आरक्षण देणारे ते होते म्हणून आम्ही त्यांच्याशी भांडलो. कारण मराठा समाजाच्या गोरगरीबाच्या आरक्षणाचा प्रश्न होता. मी पुढेही भांडणार आहे आणि नुसतं भांडण नाही तर सोडणार सुद्धा नाही. सरकारला गोरगरिबांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडावेच लागतील. त्यामुळे सरकारमध्ये कोणी पण कोणत्याही पदावर बसू दे मी सोडणार नाही. असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी यावेळी बोलताना दिला आहे.   


• उपोषण होणार म्हणजे होणार!- मनोज जरांगे

उपोषण 100% अंतरवलीत होणार. पण थोडं पुढे जायचं असे काही लोक म्हणतात. आझाद मैदानावर उपोषण होण्याची देखील शक्यता आहे. उपोषण होणार असून ते सामूहिक उपोषण होणार आहे. मात्र आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. असेही मनोज जरांगे म्हणाले. दरम्यान, प्रत्येकाला उपोषण करण्याचा अधिकार आहे. मी कधीच ओबीसी बांधव आणि त्या समाजाला विरोधक मानलेले नाही. मी सामान्य ओबीसींना एका शब्दाने देखील दुखावले नाही. आम्हाला ओबीसीचां विरोध नाही. थोड्याफार नेत्यांचा विरोध आहे. तुमच्यामुळे धनगर आरक्षणाला धक्का लागत नाही, त्यांचे नेते विनाकारण आमच्या विरोधात जात आहेत. सगळ्या पक्षात आमचा मराठा समाज आहे. सगळ्या आमदारांना मराठे आता बोलायला लावणार. असेही ते म्हणाले. 

मराठ्यांपुढे कोणतेही सत्ता टिकू शकत नाही- मनोज जरांगे

मराठ्यांची बेमानी करायची नाही तुम्हाला आरक्षण द्यावं लागणार आहे. सत्ता आली किंवा बहुमताने आलो म्हणून बेईमानी करायची नाही. पहिल्यासारखं लफड्यात पडायचं नाही. मराठ्यांपुढे कोणतेही सत्ता टिकू शकत नाही. एकदा का मराठा रस्त्यावर उतरला ना मग तुमचे काही खरं नाही. सत्ता आली म्हणून मस्तीत यायचं नाही आणि वेड्यावानी करायचं नाही. मस्ती मराठ्यांपुढे टिकत नाही आणि आम्ही ती टिकू देणारही नाही, असा इशाराही मनोज जरांगे यांनी यावेळी बोलताना दिला आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!