इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...

छ. संभाजीराजेंचे मस्साजोगमधील मंत्रीपदाबाबतचे 'खोडा' घालणारे वक्तव्य- माजी गृहराज्यमंत्री शंभुराज देसाईंनी 'खोडले' !

बीड: एमबी न्यूज वृत्तसेवा....
       स्व. संतोष देशमुख यांच्या कुटुंबांचे सांत्वन करायला आलेल्या छ. संभाजीराजे यांनी मंत्रीपदीबाबत खोडा घालणारे वक्तव्य केलं होतं.या वक्तव्याला खोडणारे वक्तव्य आता माजी गृहराज्यमंत्री शंभुराज देसाईंनी केलं आहे.

                 बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणी माजी खासदार संभाजीराजे यांनी देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत इथल्या आमदाराला मंत्री करू नये, अशी विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. त्यावर माजी गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी मोठे विधान केले आहे. देशमुख खून प्रकरणातील सर्व धोगेदोरे पोलिस तपासतील आणि या प्रकरणामागील जो सूत्रधार आहे, ज्याने कोणी हे कृत्य केले आहे, त्याला पोलिस नक्की शोधून काढतील, असा दावाही त्यांनी केला.
           माजी मंत्री देसाई म्हणाले, एखाद्या खून प्रकरणात आरोपी सापडेपर्यंत इथल्या आमदाराला मंत्री करू नका, असे म्हणण्यापेक्षा आरोपी पकडायला ज्या काही यंत्रणा लावायच्या आहेत, त्या लावल्या पाहिजेत, अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली असती तर ती अधिक योग्य ठरली असती.कुठल्याही खून प्रकरणात सर्व यंत्रणा काम करत असतात. पोलिस प्रशासन तपासाचे सर्व मार्ग धुंडाळत असतात. मी सुद्धा अडीच वर्षे गृहविभागाचा राज्यमंत्री म्हणून काम केले आहे. संतोष देशमुख खून प्रकरणतील सर्व धोगेदोरे तपासतील आणि या प्रकरणामागील सूत्रधार आहे, ज्याने कोणी हे कृत्य केले आहे, त्याला राज्याचे पोलिस नक्की शोधून काढतील, असा दावाही शंभूराज देसाईंनी केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....