प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

धनंजय मुंडेंचे मुख्यमंत्री व पोलीस अधीक्षकांना पत्र

स्व.संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावे - धनंजय मुंडे

संतोष देशमुख हत्या प्रकरण फास्ट्रॅक कोर्टात चालवले जावे, धनंजय मुंडेंचे मुख्यमंत्री व पोलीस अधीक्षकांना पत्र


या प्रकरणाच्या आडून कुणीही राजकारण आणि जिल्ह्याची बदनामी करू नये - धनंजय मुंडे यांचे आवाहन


परळी वैद्यनाथ (दि. 12) - मस्साजोग येथील सामाजिक कार्यकर्ते स्व.संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण अत्यंत दुर्दैवी व गंभीर स्वरूपाचे आहे. या स्वरूपाची गुन्हेगारी हे समाज विघातक असून अशा वृत्तीला वेळीच ठेचले गेले पाहिजे, यासाठी या प्रकरणातील सर्वच्या सर्व आरोपींना कठोर शासन केले जावे असे मत धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे. 


आज लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्यात आले होते, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना याविषयी आपले मत व्यक्त केले. 


अशा स्वरूपाची गुन्हेगारी ही घातक असून पुन्हा वेळीच कठोर शासन केले जावे व देशमुख कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जावे असेही धनंजय मुंडे म्हणाले. 


संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक केली जावी तसेच हे प्रकरण फास्ट्रॅक कोर्टात चालवले जावे या संदर्भात धनंजय मुंडे यांनी एक पत्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनाही दिले आहे. 


गुन्हेगारी ही एक अपप्रवृत्ती आहे, तिला जात नसते, मात्र या प्रकरणाचा अडून काही जण जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करून जातीय तेढ निर्माण करण्याचा  तसेच या दुर्दैवी घटनेच्या आडून राजकारण साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. 


पवनचक्कीच्या संदर्भातील कामाच्या वादातून ही हत्या झाल्याचे समजते, मात्र जाणीवपूर्वक याआडून बीड जिल्ह्याची बदनामी केली जात आहे. पोलीस यंत्रणा, तपास यंत्रणा तसेच न्यायव्यवस्था या माध्यमातून संतोष देशमुख यांना नक्कीच न्याय मिळेल, कुणीही नाहक जिल्ह्याची बदनामी करू नये, असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलताना केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या