प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

✍️ डॉ.चंद्रकांत लोखंडे यांचा प्रासंगिक लेख >>>>अद्वितीय लोकनेता ; अविस्मरणीय नेतृत्व: गोपीनाथराव मुंडे

अद्वितीय लोकनेता ; अविस्मरणीय नेतृत्व: गोपीनाथराव मुंडे

  दरणीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची आज अमृत महोत्सव जयंती  आहे. साहेबांचा जन्म १२ डिसेंबर १९४९ रोजी कार्तिकी र्पोर्णिमेच्या मध्यरात्री एका शेतकरी कुटुंबात झाला.त्यावेळी भविष्याबद्दल तो भारत सरकारचा केंद्रीय मंत्री होऊ शकतो असे जर त्यावेळी कोणी म्हटले असते, तर त्यावेळी ही बाव हास्यास्पद ठरली असती. परंतु ही अशक्यप्राय गोष्ट लोकनेते. गोपीनाथराव मुंडे यांनी प्राप्त केली.

         कोणत्याही देशाचा विकास हा त्या देशाच्या नेतृत्वाच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो. नेतृत्व हे जर दुर्बल, दृष्टीहीन लाभले तर विकास होत नाही. पोकळ नेते, शौर्याचे प्रदर्शन करतात आणि त्यांच्या कर्तृत्वाचे वचन देतात परंतु जेव्हा कामाची वेळ असते तेव्हा ते शिळे पडतात. लोकनेते मात्र वचन न देता सर्वकाही करतात आणि कर्तबगारी बदल ब्र ही काढत नाहीत . 'समुहातील लोकप्रिय व्यक्ती म्हणजे नेता' अशी व्याख्या केली आहे. ती व्याख्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना सार्थ ठरते.

        साहेबांनी असंख्य आयुष्य घडवलेल्या त्यापैकी अनेकजन देशाच नेतृत्व करतात. तर कहीजन महाराष्ट्राचे नेतृत्व करतात . त्यात वर्तमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस जी हे सुद्धा साहेबांच्य वटवृक्षा खाली वढलं असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

     मला आज ही तो दृढनिश्चयी आवज जशा तशासते स्मरणात आहे 

' मी उतणार नाही

मातणार नाही,

घेतलेला वसा,

टाकणार नाही'

        हे शब्द परळीकरांना ऊर्जा देऊन जात असत, परळीकर साहेबांना टाळ्यांच्या गजरात अभिवादन करायची असे माझे साहेब होते. ते अनेकांचे श्रीकृष्ण होते अनेक अर्जुन घडवले. त्यांना म्होरक्या म्हणून मिरवण्यात अभिमान नव्हतं संवगडी म्हणून राहण्यात जास्त रस होता. त्यांना सत्तेचा घमंड कधी आला नाही गरजूवंतांच्या मदतीला नेहमीच पुढे सरसवले असे माझे साहेब होते. ते यदुवंशी कृष्णा सारखे अखंडतेने संघर्षात वाढली शकुनी सारख्या प्रवृत्तींना संपवण्यात व कंसासारखे प्रवृतींचा नायनाट करण्यासाठी झगडले. साहेब कधी सत्तेसाठी धडपडली नाहीत मात्र सामान्यांसाठी उभा राहिले

      देशात आणिबाणीची लाट पसरल्यामुळे महाराष्ट्र सरकारने अटक सत्र सुरू केले. साहेबांना १६ महिन्यांचा करावास झाला. पुढे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तारासाठी तुरुंगवास भोगला तर उर्दू भाषेच्या सन्मानासाठी संसदेत भांडले. असे सर्वांगीण विचार करणार लोकनेते म्हणजे गोपीनाथराव मुंडे साहेबच असू शकतात. 

      गोरगरिबाच्या मुलांनीही इंजिनियर व्हावे म्हणून इंजिनिअरिंग कॉलेज उभारले. ऊसतोड कामगारांनी ही साखर कारखान्यात भागीदार खूप म्हणून साखर कारखाना उभारला.जेवढे ताकतीने या मागास क्षेत्राचा विकास करता येईल तेवढ्याच ताकतीने ते करत राहिले. जेवढे ताकतीने या मागास क्षेत्राचा विकास करता येईल तेवढ्याच ताकतीने ते करत राहिले. असे सर्वांगीण विचार करणार लोकनेते म्हणजे गोपीनाथराव मुंडे साहेबच असू शकतात. लोकभिमुख योजनेसाठी साहेब सदैव पुढाकार घेत असे ज्यामुळे लोकांचे कल्याण होऊन हीच त्यांच्या मनी संकल्पना असे. साहेबांचा अंश पंकजाताई आणि प्रीतम ताई यांच्या माध्यमातून आजही परळीच्या विकासासाठी झगडताना दिसतो. नामदार धनंजयजी मुंडे साहेबांची कार्यपद्धती पाहिल्यावर साहेबांची चुणूक त्यामध्ये स्पष्टपणे दिसून येते. साहेबांच्या विचारांची ध्वजा आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांनी खांद्यावर आहे. ती सदैव कार्यरत असेल हेच साहेबांना खरं अभिवादन असेल. 

✍️....लेखक- डॉ.चंद्रकांत लोखंडे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या