इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

काळजाला हेलावून टाकणारी दुर्दैवी घटना: मुलाच्या आत्महत्येनंतर पित्यानेही त्याच दोरीने घेतला गळफास

नांदेड जिल्ह्य़ातील बिलोली तालुक्यातील मिनकी येथील अल्पभूधारक शेतकरी राजेंद्र लक्ष्मण पैलवार (वय 43) व त्यांचा मुलगा ओमकार (वय 16) यांनी स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि.९) सकाळी उजेडात आली.


राजेंद्र पैलवार यांना पत्नी, तीन मुले आहेत. पहिला मुलगा बारावी पास असून तो शेती पाहतो. दुसरा मुलगा अकरावीत तर तिसरा ओमकार हा दहावीचे शिक्षण घेतो. दोघेही लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे शंकर माध्यमिक विद्यालय आश्रम शाळेत शिकतात. पैलवार यांना २ एकर शेती असून, त्यावर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे साडे चार लाखांचे कर्ज आहे. याशिवाय काही खासगी कर्ज होते. कर्ज व सततची नापिकी तसेच मुलांच्या शिक्षणामुळे घरात आर्थिक ताण पडत असे. त्यातच संक्रात सणानिमित्त दोन दिवसांपूर्वी उदगीर येथे शिकायला असलेली दोन्ही मुले गावाकडे आली होती.


ओमकार हा बुधवारी दुपारी वडिलांकडे नवीन कपडे, शालेय साहित्य, नवीन मोबाईल घेण्यासाठी पैसे मागत होता. परंतु, वडिलांनी काही दिवस थांब, सध्या पैसे नाहीत, असे सांगितल्याने तो नाराज झाला. त्या नैराश्यात येऊन रात्रीच्या वेळेस शेतातील झाडास गळफास घेत आत्महत्या केली. मुलगा घरी नसल्याचे पाहून वडिलांनी दुसर्‍या दिवशी सकाळी त्याची शोधाशोध करीत शेताकडे गेला असता शेतातील लिंबाच्या झाडाला मुलगा गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळले. मुलाने गळफास घेतलेले पाहून त्यांनी आत्महत्या केलेल्या मुलांचा दोरखंड सोडून त्यानेच गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या