इमेज
  दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी दिपक गोविंद गित्ते  इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो येथे सिलेक्शन  परळी ( प्रतिनिधी) दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी चिरंजीव दीपक गोविंदराव गित्ते यांची मध्यप्रदेश भोपाल येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो या खेळामध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल शाळेचे प्रेरणास्थान मार्गदर्शक मा. श्री .किरण गित्ते साहेब IAS सचिव : सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, उद्योग व वाणिज्य विभाग त्रिपुरा सरकार,  विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्षा : सौ.उषाताई किरण गित्ते , शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. श्रीकांत पाटील सर यांनी गोविंद गित्ते कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .  या स्पर्धा मध्य प्रदेश भोपाल येथे इंटरनॅशनल या स्पर्धा दिनांक 12 मे 2026 रोजी होणार आहेत.           मराठवाड्यातील  नामांकित दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलने आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना खेळामध्ये महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले असून आता दीपक गोविंदराव गित्ते या विद्यार्थ्य...

काळजाला हेलावून टाकणारी दुर्दैवी घटना: मुलाच्या आत्महत्येनंतर पित्यानेही त्याच दोरीने घेतला गळफास

नांदेड जिल्ह्य़ातील बिलोली तालुक्यातील मिनकी येथील अल्पभूधारक शेतकरी राजेंद्र लक्ष्मण पैलवार (वय 43) व त्यांचा मुलगा ओमकार (वय 16) यांनी स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि.९) सकाळी उजेडात आली.


राजेंद्र पैलवार यांना पत्नी, तीन मुले आहेत. पहिला मुलगा बारावी पास असून तो शेती पाहतो. दुसरा मुलगा अकरावीत तर तिसरा ओमकार हा दहावीचे शिक्षण घेतो. दोघेही लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे शंकर माध्यमिक विद्यालय आश्रम शाळेत शिकतात. पैलवार यांना २ एकर शेती असून, त्यावर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे साडे चार लाखांचे कर्ज आहे. याशिवाय काही खासगी कर्ज होते. कर्ज व सततची नापिकी तसेच मुलांच्या शिक्षणामुळे घरात आर्थिक ताण पडत असे. त्यातच संक्रात सणानिमित्त दोन दिवसांपूर्वी उदगीर येथे शिकायला असलेली दोन्ही मुले गावाकडे आली होती.


ओमकार हा बुधवारी दुपारी वडिलांकडे नवीन कपडे, शालेय साहित्य, नवीन मोबाईल घेण्यासाठी पैसे मागत होता. परंतु, वडिलांनी काही दिवस थांब, सध्या पैसे नाहीत, असे सांगितल्याने तो नाराज झाला. त्या नैराश्यात येऊन रात्रीच्या वेळेस शेतातील झाडास गळफास घेत आत्महत्या केली. मुलगा घरी नसल्याचे पाहून वडिलांनी दुसर्‍या दिवशी सकाळी त्याची शोधाशोध करीत शेताकडे गेला असता शेतातील लिंबाच्या झाडाला मुलगा गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळले. मुलाने गळफास घेतलेले पाहून त्यांनी आत्महत्या केलेल्या मुलांचा दोरखंड सोडून त्यानेच गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....