इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

अंबाजोगाई तालुक्यात खंडणीचा प्रकार समोर; महिला सरपंचाला मागितली एक लाखाची खंडणी


 अंबाजोगाई, प्रतिनिधी...

        केज तालुक्यातील मस्साजोग येथे आवादा कंपनीला खंडणी मागितल्याच्या प्रकरणाने राज्यभर चर्चा होत असतानाच आता अंबाजोगाई तालुक्यातही एका महिला सरपंचालाच खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर पाटोदा ग्रामपंचायतच्या महिला सरपंचाला गावातीलच उपसरपंच व अन्य दोन ग्रामपंचायत सदस्यांनी एक लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

         याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, ममदापूर पाटोदा ता. अंबाजोगाई येथील महिला सरपंच मंगल राम मामडगे यांना तिघाजणांनी एक लाख रुपये खंडणी मागितल्याची फिर्याद दिल्यानंतर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.या महिला सरपंचांनी फिर्यादीत म्हटले आहे की, ममदापूर पाटोदा या गावात विकास कामाकरिता निधी आल्यानंतर वेळोवेळी हेच लोक अडथळे आणतात. त्याचबरोबर शासकीय कार्यालयात जाऊन खोट्या तक्रारी देतात. आपल्यावर मानसिक दहशत टाकतात. असे प्रकार वारंवार होत होते. दि. 16 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हा परिषद शाळा ममदापूर येथील दुरुस्तीची कामे सुरू होती. ते पाहण्याकरिता जात असताना वसंत सोपान शिंदे, अनिल लालासाहेब देशमुख व ज्ञानोबा श्रीमंतराव देशमुख हे शाळेजवळ आले. एकमेकांना बोलत असताना गावातील साक्षीदार दोन व्यक्ती समोर त्यांनी सरपंचांना शाळा दुरुस्तीच्या कामासाठी आलेल्या चार लाख रुपयांपैकी एक लाख रुपये आम्हाला द्या अशी मागणी केली. एक लाख रुपये नाही दिले तर तुम्हाला गावातील कोणतेच काम करू देणार नाही. तसेच तुमच्यावर अर्ज देऊन आधीच्या माजी महिला सरपंचांनी  आम्हाला पैसे न दिल्यामुळे त्यांना जेलमध्ये जावे लागले तशीच तुमची अवस्था करून टाकू अशी धमकी दिली. याबाबत  त्याच वेळी या लोकांविरुद्ध ऑनलाइन तक्रार केली होती. त्यामुळे आज दि.१५ जाने.२०२५ रोजी प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात येऊन आपण तक्रार नोंदवत असल्याचे या महिला सरपंचांनी फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या