इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

जिल्हा प्रशासनाकडून दलित आंदोलकांची फसवणूक केल्याचा आरोप

बीडमध्ये धक्कदायक प्रकार उघड : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्यांना भेटायला आले 'फेक अधिकारी' !

जिल्हा प्रशासनाकडून दलित आंदोलकांची फसवणूक केल्याचा आरोप

 बीड, प्रतिनिधी...

      बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या पाच दिवसापासून विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. या उपोषण स्थळावर आज वरिष्ठ अधिकारी म्हणून आंदोलन सोडविण्यासाठी भेट द्यायला आलेले अधिकारी त्यांच्या त्यांच्या ओळखपत्राप्रमाणे नसल्याचा प्रकार समोर आला. या आंदोलनकर्त्यांनीच याचा भांडाफोड केला आहे. जिल्हाधिकारी व प्रशासनानेच अशा प्रकारे बोगसगिरी करून आंदोलकांची दिशाभूल व फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्यास आरोप या आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

     बीड रेल्वे स्थानकाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे, त्याचबरोबर दादर येथील रेल्वे स्थानकाला चैत्यभूमी रेल्वे स्थानक असे नाव द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी गेल्या पाच दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे.  या आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने दलित समाज बांधव सहभागी होते.या अनुषंगाने या आंदोलनकर्त्यांना भेट देण्यासाठी व त्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावे अशा प्रकारची मागणी होती. या संदर्भाने बीड जिल्ह्यातील महसूल प्रशासनातीलच काही लोकांना बोगस ओळखपत्र देवून त्याआधारे वरिष्ठ अधिकारी असे भासवत या आंदोलनकर्त्यांची भेट घेण्यात आली. वरिष्ठ अधिकारी असल्याचे दाखवत या ठिकाणी हे आंदोलन सोडविण्याचा प्रयत्न झाला. मात्र या आंदोलकांनीच याचा जागेवरच भांडाफोड केला असुन ज्या अधिकाऱ्यांना जी ओळखपत्रं होती त्या ओळखपत्रानुसार त्यांची नावे नव्हती. तर ते बनावट वरिष्ठ अधिकारी म्हणूनच आले आणि आंदोलनकर्त्यांची त्यांनी फसवणूक केली असा आरोप या आंदोलकांनी केला आहे. दरम्यान ओळखपत्र व वास्तविक ओळख यामध्ये तफावत असल्याचा जागेवरच भांडाफोड झाल्याने या अधिकाऱ्यांची मात्र चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान, जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाने दलित समाजाची घोर फसवणूक केली असुन अशा प्रकारे प्रशासनात प्रशासनामार्फतच बोगसगिरीचा फंडा वापरला जात असेल तर याच्या मुळापर्यंत जाऊन संबंधितांना कठोर कारवाई करावी अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या