इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

 विद्यार्थिनींना स्व संरक्षण ही काळाची गरज- प्राचार्य अतुल दुबे

परळी वैजनाथ दि.२४ (प्रतिनिधी)

      आजच्या काळात घडणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या घडणाऱ्या घटना पाहता विद्यार्थिनींना स्व संरक्षण करणे काळाची गरज निर्माण झाली असल्याचे मत यशवंतराव चव्हाण कनिष्ट महाविद्यालयाचे प्राचार्य अतुल दुबे व्यक्त केले आहे.

              लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने तालुक्यातील सेलू (परळी) येथे विशेष युवती शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात प्राचार्य अतुल दुबे बोलत होते. या कार्यक्रमात पत्रकार प्रा रविंद्र जोशी, कार्यक्रमाधिकारी प्रा डॉ विनोद जगतकर, प्रा डॉ राजश्री कल्याणकर, प्रा डॉ रंजना शहाणे, प्रा डॉ विना भांगे, प्रा पी एम फुटके उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना प्राचार्य दुबे म्हणाले की, आज संपूर्ण भारतात महिला व युवतीवरील अत्याचारात वाढ झाली आहे. यासाठी विद्यार्थिनींनी स्व संरक्षण करण्यासाठी तयार झाले पाहिजे. तर प्रा जोशी यांनी सांगितले की, आजच्या परिस्थितीत महिलांना सहजीवन साथी म्हणून दर्जा दिला पाहिजे. पुरुषांच्या बरोबरीने वागवले पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने स्त्री, पुरुष समानता निर्माण होईल. शिबीरात सकाळच्या सत्रात सेलू गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावात स्वच्छता मोहीम राबवत गावात स्वच्छतेचे महत्त्व समजून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्या सातपुते हीने तर प्रास्ताविक प्रा.प्रविण फुटके यांनी केले. आभार गौरी पुजारी हिने मानले. कार्यक्रमास विद्यार्थी, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या