इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

परळीच्या भूमिपुत्राची कंपनी सुपा व अहिल्यानगर येथे उभारणार दोन प्रकल्प

 परळी तालुक्यातील भरत गित्ते यांच्या टॉरल इंडिया कंपनीचा दावोस मध्ये महाराष्ट्र शासनाशी करार

मंत्री धनंजय मुंडे यांनी पोस्ट शेअर करत भरत गित्ते यांचे समस्त परळीकर यांच्या वतीने केले अभिनंदन आणि कौतुक

परळीच्या भूमिपुत्राची कंपनी सुपा व अहिल्यानगर येथे उभारणार दोन प्रकल्प, बाराशे पेक्षा अधिक रोजगार निर्मिती, तर जागतिक स्तरावर निर्यात क्षम उत्पादने करणार तयार

मुंबई (प्रतिनिधी) - परळी तालुक्यातील नंदागौळ या छोट्याशा गावात जन्मलेले परळीचे भूमिपुत्र भरत गित्ते यांच्या टॉरल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने दाऊशे ते सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये महाराष्ट्र शासनाची दोन प्रकल्प महाराष्ट्रात उभारण्याबाबत सामंजस्य करार केला असून, अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी याबाबत पोस्ट शेअर करत भरत गित्ते व त्यांच्या टीमचे अभिनंदन आणि कौतुक केले आहे. 


भरत गित्ते यांच्या टरल इंडिया या कंपनीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सुपा व अहिल्यानगर या ठिकाणी अत्याधुनिक ॲल्युमिनियम कास्टिंग सोल्युशन निर्माण करून ते जगभरात निर्यात करता येईल अशा पद्धतीचे प्रकल्प उभारण्यात येणार असून यासाठी 500 कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक केली जाणार असून 1200 पेक्षा अधिक रोजगारांची याद्वारे निर्मिती होणार आहे. 


दरम्यान या ना त्याकारणाने मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असलेल्या परळी तालुक्यातील नंदागौळ या छोट्याशा गावचे सुपुत्र असलेले भरत गित्ते यांनी आंतरराष्ट्रीय दर्जावर आपल्या टाॅरल इंडिया या कंपनीची छापून ठेवली असून त्या कंपनीचे महाराष्ट्र मध्ये दोन प्रकल्प उभारत रोजगार निर्मितीत तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देत असल्याबद्दल धनंजय मुंडे यांनी अभिमान आणि आनंदाचा हा क्षण असल्याचे म्हणत भरत गित्ते यांचे कौतुक केले आहे. 


त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने टॉरल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला ही संधी उपलब्ध करून समस्त परळीकरांना हा बहुमान प्राप्त करून दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उद्योग मंत्री उदय सामंत यांचे देखील धनंजय मुंडे यांनी आभार व्यक्त करत भरत गित्ते व त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या