इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

परळी पोलीस ठाण्यासमोरील वाल्मीक कराड समर्थकांचे आंदोलन तात्पुरते स्थगित  !

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

         परळी पोलीस ठाण्यासमोरील वाल्मीक कराड समर्थकांचे आंदोलन रात्री ९ वा सुमारास तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. उद्या सकाळी पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे. दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांनी आंदोलनाला भेट देवून  निवेदन स्वीकारले आहे.

       मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण संपूर्ण राज्यात चर्चेत आहे.याअनुषंगाने आवादा कंपनीच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेले वाल्मीक कराड यांच्यावर अन्याय होत असून माझ्या मुलाला न्याय द्या अशी मागणी करत वाल्मीक कराड यांच्या आईने परळी पोलीस ठाण्यात ठिय्या सुरू केला आहे. त्यानंतर वाल्मीक कराड समर्थकांकडून परळीत दिवसभर आंदोलन सुरुच होते.रात्री ९ वा सुमारास हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. उद्या सकाळी दहा वाजता पुन्हा पोलीस स्टेशन समोर आंदोलन केले जाणार आहे. त्या संदर्भातली अगोदर बैठक घेऊ आणि आंदोलनाची दिशा ठरवू असे  सांगण्यात आले आहे. मात्र परळी बेमुदत बंदची हाक यावेळी देण्यात आलेली आहे. जोपर्यंत शासन निर्णय घेत नाही तोपर्यंत परळी बंद ठेवणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आलेला आहे.उद्या सकाळी दहा वाजता ची मिटिंग झाल्यानंतर बीड जिल्हा बंद करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे.

          दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांनी या आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला .आंदोलकांच्या वतीने कायदेशीर तपासाबाबत जे काही निवेदन देण्यात आलेले आहे त्या निवेदनाचा स्वीकार करून आपण ते शासनापर्यंत पाठवू अशा प्रकारचे आश्वासन आंदोलकांना त आपण दिले आहे. कायद्याच्या अखत्यारीत राहूनच सर्व काही तपास केला जाईल. नागरिकांनी शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी काळजी घ्यावी व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन यावेळी चेतना तिडके यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या