दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

परळी पोलीस ठाण्यासमोरील वाल्मीक कराड समर्थकांचे आंदोलन तात्पुरते स्थगित  !

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

         परळी पोलीस ठाण्यासमोरील वाल्मीक कराड समर्थकांचे आंदोलन रात्री ९ वा सुमारास तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. उद्या सकाळी पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे. दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांनी आंदोलनाला भेट देवून  निवेदन स्वीकारले आहे.

       मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण संपूर्ण राज्यात चर्चेत आहे.याअनुषंगाने आवादा कंपनीच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेले वाल्मीक कराड यांच्यावर अन्याय होत असून माझ्या मुलाला न्याय द्या अशी मागणी करत वाल्मीक कराड यांच्या आईने परळी पोलीस ठाण्यात ठिय्या सुरू केला आहे. त्यानंतर वाल्मीक कराड समर्थकांकडून परळीत दिवसभर आंदोलन सुरुच होते.रात्री ९ वा सुमारास हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. उद्या सकाळी दहा वाजता पुन्हा पोलीस स्टेशन समोर आंदोलन केले जाणार आहे. त्या संदर्भातली अगोदर बैठक घेऊ आणि आंदोलनाची दिशा ठरवू असे  सांगण्यात आले आहे. मात्र परळी बेमुदत बंदची हाक यावेळी देण्यात आलेली आहे. जोपर्यंत शासन निर्णय घेत नाही तोपर्यंत परळी बंद ठेवणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आलेला आहे.उद्या सकाळी दहा वाजता ची मिटिंग झाल्यानंतर बीड जिल्हा बंद करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे.

          दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांनी या आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला .आंदोलकांच्या वतीने कायदेशीर तपासाबाबत जे काही निवेदन देण्यात आलेले आहे त्या निवेदनाचा स्वीकार करून आपण ते शासनापर्यंत पाठवू अशा प्रकारचे आश्वासन आंदोलकांना त आपण दिले आहे. कायद्याच्या अखत्यारीत राहूनच सर्व काही तपास केला जाईल. नागरिकांनी शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी काळजी घ्यावी व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन यावेळी चेतना तिडके यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....