इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

परळी पोलीस ठाण्यासमोरील वाल्मीक कराड समर्थकांचे आंदोलन तात्पुरते स्थगित  !

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

         परळी पोलीस ठाण्यासमोरील वाल्मीक कराड समर्थकांचे आंदोलन रात्री ९ वा सुमारास तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. उद्या सकाळी पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे. दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांनी आंदोलनाला भेट देवून  निवेदन स्वीकारले आहे.

       मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण संपूर्ण राज्यात चर्चेत आहे.याअनुषंगाने आवादा कंपनीच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेले वाल्मीक कराड यांच्यावर अन्याय होत असून माझ्या मुलाला न्याय द्या अशी मागणी करत वाल्मीक कराड यांच्या आईने परळी पोलीस ठाण्यात ठिय्या सुरू केला आहे. त्यानंतर वाल्मीक कराड समर्थकांकडून परळीत दिवसभर आंदोलन सुरुच होते.रात्री ९ वा सुमारास हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. उद्या सकाळी दहा वाजता पुन्हा पोलीस स्टेशन समोर आंदोलन केले जाणार आहे. त्या संदर्भातली अगोदर बैठक घेऊ आणि आंदोलनाची दिशा ठरवू असे  सांगण्यात आले आहे. मात्र परळी बेमुदत बंदची हाक यावेळी देण्यात आलेली आहे. जोपर्यंत शासन निर्णय घेत नाही तोपर्यंत परळी बंद ठेवणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आलेला आहे.उद्या सकाळी दहा वाजता ची मिटिंग झाल्यानंतर बीड जिल्हा बंद करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे.

          दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांनी या आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला .आंदोलकांच्या वतीने कायदेशीर तपासाबाबत जे काही निवेदन देण्यात आलेले आहे त्या निवेदनाचा स्वीकार करून आपण ते शासनापर्यंत पाठवू अशा प्रकारचे आश्वासन आंदोलकांना त आपण दिले आहे. कायद्याच्या अखत्यारीत राहूनच सर्व काही तपास केला जाईल. नागरिकांनी शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी काळजी घ्यावी व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन यावेळी चेतना तिडके यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!