परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या कामकाजाबाबत घेतले मार्गदर्शन

 धनंजय मुंडे यांनी घेतली ज्येष्ठ नेते छगन भुजबळांची सदिच्छा भेट अन् घेतले आशीर्वाद

अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या कामकाजाबाबत घेतले मार्गदर्शन


मुंबई (दि. १०) - राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांची मुंबई येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले आहेत.


ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे मागील काळामध्ये बरेच वर्ष अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री राहिलेले आहेत, त्यादृष्टीने या विभागाचे कामकाज अधिक प्रभावीपणे करण्यासाठी धनंजय मुंडे यांनी श्री छगन भुजबळ यांच्याकडून मार्गदर्शनही घेतले असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. 


मुख्यमंत्री महोदयांनी सुचवलेला शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम १००% यशस्वी करण्यासाठी धनंजय मुंडे यांच्या विभागाला सूचना


दरम्यान धनंजय मुंडे यांनी आज मंत्रालयातील त्यांच्या दालनामध्ये अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या सचिव श्रीमती जयश्री भोज यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुचवलेला शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम शंभर टक्के यशस्वी करण्याच्या दृष्टीने व अधिक प्रभावी पद्धतीने कामकाज करण्याच्या दृष्टीने विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!