युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती

राजकिशोर मोदी ,अँड. विष्णुपंत सोळंके व श्री. प्रकाश सोळंकी यांच्याकडून अभिनंदन 


परळी वैजनाथ/प्रतिनिधी 

बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी उपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार साहेब यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांचे महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे संचालकराजकिशोर मोदी कॉटन फेडरेशन माजी उपाध्यक्ष अँड. विष्णुपंत सोळंके आणि अंबाजोगाई पिपल्स बँकेचे व्हा. चेअरमन श्री. प्रकाश सोळंकी यांनी मुंबई येथे भेट घेऊन त्यांचे हार्दिक अभिनंदन केले. या भेटीवेळी अंबेजोगाई विकासा संदर्भात तसेच विविध महत्त्वाच्या विषयांवर  चर्चा करण्यात आली.

मा ना अजित पवार यांच्या पालकमंत्रीपदाची निवड ही बीड जिल्ह्यासाठी महत्त्वाची  युवकांचे रोजगानिर्मिती ची संधी असल्याचे राजकिशोर मोदी अँड. विष्णुपंत सोळंके यांनी सांगितले. त्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कापूस ,, सोयाबीन  चे हमी भावाने खरेदी मधील शेतकऱ्यांचे अडचणी सांगून त्या दुर करणे साठी दादांना विनंती केली शिक्षण, पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकास यासंबंधी उपमुख्यमंत्र्यांकडे मागण्या मांडल्या.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, मार्केटिंग धोरणे, आणि शैक्षणिक व आर्थिक प्रगतीवर v ग्रामीण विकास कडे विशेष लक्ष केंद्रित करण्याचे आश्वासन दिले.

राजकिशोर मोदी ,. अँड. विष्णुपंत सोळंके आणि  प्रकाश सोळंकी यांनीही  सतत प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री पदी अजित पवार यांची नियुक्ती जिल्ह्यासाठी नवा आशावाद निर्माण करणारी असून, आगामी काळात जिल्ह्याच्या विकासासाठी ही जबाबदारी महत्वाची ठरणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या