इमेज
  दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी दिपक गोविंद गित्ते  इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो येथे सिलेक्शन  परळी ( प्रतिनिधी) दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी चिरंजीव दीपक गोविंदराव गित्ते यांची मध्यप्रदेश भोपाल येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो या खेळामध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल शाळेचे प्रेरणास्थान मार्गदर्शक मा. श्री .किरण गित्ते साहेब IAS सचिव : सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, उद्योग व वाणिज्य विभाग त्रिपुरा सरकार,  विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्षा : सौ.उषाताई किरण गित्ते , शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. श्रीकांत पाटील सर यांनी गोविंद गित्ते कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .  या स्पर्धा मध्य प्रदेश भोपाल येथे इंटरनॅशनल या स्पर्धा दिनांक 12 मे 2026 रोजी होणार आहेत.           मराठवाड्यातील  नामांकित दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलने आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना खेळामध्ये महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले असून आता दीपक गोविंदराव गित्ते या विद्यार्थ्य...

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती

राजकिशोर मोदी ,अँड. विष्णुपंत सोळंके व श्री. प्रकाश सोळंकी यांच्याकडून अभिनंदन 


परळी वैजनाथ/प्रतिनिधी 

बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी उपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार साहेब यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांचे महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे संचालकराजकिशोर मोदी कॉटन फेडरेशन माजी उपाध्यक्ष अँड. विष्णुपंत सोळंके आणि अंबाजोगाई पिपल्स बँकेचे व्हा. चेअरमन श्री. प्रकाश सोळंकी यांनी मुंबई येथे भेट घेऊन त्यांचे हार्दिक अभिनंदन केले. या भेटीवेळी अंबेजोगाई विकासा संदर्भात तसेच विविध महत्त्वाच्या विषयांवर  चर्चा करण्यात आली.

मा ना अजित पवार यांच्या पालकमंत्रीपदाची निवड ही बीड जिल्ह्यासाठी महत्त्वाची  युवकांचे रोजगानिर्मिती ची संधी असल्याचे राजकिशोर मोदी अँड. विष्णुपंत सोळंके यांनी सांगितले. त्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कापूस ,, सोयाबीन  चे हमी भावाने खरेदी मधील शेतकऱ्यांचे अडचणी सांगून त्या दुर करणे साठी दादांना विनंती केली शिक्षण, पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकास यासंबंधी उपमुख्यमंत्र्यांकडे मागण्या मांडल्या.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, मार्केटिंग धोरणे, आणि शैक्षणिक व आर्थिक प्रगतीवर v ग्रामीण विकास कडे विशेष लक्ष केंद्रित करण्याचे आश्वासन दिले.

राजकिशोर मोदी ,. अँड. विष्णुपंत सोळंके आणि  प्रकाश सोळंकी यांनीही  सतत प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री पदी अजित पवार यांची नियुक्ती जिल्ह्यासाठी नवा आशावाद निर्माण करणारी असून, आगामी काळात जिल्ह्याच्या विकासासाठी ही जबाबदारी महत्वाची ठरणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....