इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

राष्ट्रीय सेवा योजना शिबिर: वसंतनगर येथे संविधान रॅली !

भारतीय संविधानचे आचरण हेच प्रत्येकचे कर्तव्य पाहिजे- प्राचार्या अर्चना चव्हाण

परळी - वैः - वसंतनगर येथे  वैद्यनाथ कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिर दिनांक २४ जानेवारी २०२५ रोजी  युथ फॉर भारत ॲन्ड युथ फॉर डिजिटल लिटरसी ही संकल्पना घेऊन  सात दिवशीय निवासी शिबीर  उद्घाटन  माझा भारत माझे संविधान माझे आचरण संविधान रॅली द्वारे प्राचार्या अर्चना चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले. याकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अरुण पवार , तर प्रमुख पाहुणे कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला कॉलेजच्या प्राचार्या विद्या देशमुख  , सरपंच विजय राठोड, उपसरपंच कुंडलीकराव जाधव ,प्रा. डॉ माधव  रोडे,  उपप्राचार्य  प्रा. हरिश मुंडे, प्रा. डॉ. रमेश राठोड, प्रा. भिमानंद गजभारे , प्रा. डॉ. एम. जी. लांडगे अदि.  उपस्थिती होते.  यावेळी भारतीय संविधान आणि आपले कर्तव्य याविषयावर प्राचार्या अर्चना चव्हाण व्याख्यान दिले. त्याप्रसंगी त्या म्हणाल्या भारतीय संविधानने आपल्याला जीवन जगण्याचे  मुलभुत अधिकार दिले. त्याच बरोबर आपल्या हक्कांची जाणीव करून दिली , स्वातंत्र्य, बंधुत्ता, न्याय ही तत्व आपण स्विकारली. सर्वच माणसाला जगण्याचा सन्मान डॉ. बाबासाहेबांनी मिळऊन दिला. शोषणाला विरोध करण्याचे शक्ती दिली. भारतीय संविधानाचे आचरण हेच आपले कर्तव्य आहे हे लक्षात ठेवा असे मत प्राचार्या अर्चना चव्हाण यांनी व्यक्त केले. तर प्रमुख पाहुण्या प्राचार्या विद्या देशमुख म्हणाल्या आपण साक्षर झालोत आता भारतासाठी डिजीटल साक्षर होण्याची तयारी सुरू आहे. परंतु तत्रंज्ञान युगात  समाज मध्यामावर व्यक्त होत असताना आपण सामाजिक बांधिलकीचे भान ठेवावे. अध्यक्षीय समारोप प्राचार्य अरुण पवार वेळी म्हणाले भारतीय संविधान आपल्या जीवन जगण्याची तत्व निमावली आहे एक सार्वजिनक एकात्मातचे प्रतिक आहे. त्याला जपने आपल्याच हाथ आहे. तर कार्यक्रमाचे  प्रास्ताविक प्रा डॉ भिमानंद गजभारे यांनी व सुत्र संचलन प्रा प्रमोद गीत्ते आभार डॉ. श्रीहरी गुट्टे , प्रा. दिलीप गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन एन. एस. एस. विभागाच्या वतीने करण्यात आले. त्यात सागर जगताप , आरती शिंदे , शितल मुंडे , आफरिण पठाण , प्रणव आघाव , अभिजीत रोडे , संक्षम सरवदे , चैतन्य गीत्ते , अशिष मुंडे , किरण गुट्टे , करण गीत्ते, युवराज गीत्ते , शुंभिगी कंचनवाड , नम्रता सरवदे आदिनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या