इमेज
  घरकुल लाभार्थ्यांची थट्टा थांबवा, अन्यथा आंदोलन; महादेव गंगणे पाटील यांचा परळी पालिकेला इशारा परळी वैजनाथ (प्रतिनिधी) रमाई घरकुल योजनेंतर्गत १५४ लाभार्थ्यांना १ कोटी १ लाख ८१ हजार २५० रुपयांचा निधी वर्ग केल्याच्या बातम्या प्रसिद्ध करून स्वतःची पाठ थोपवून घेणाऱ्या परळी नगर परिषदेचा फुगा फुटला आहे. प्रत्यक्षात एकाही लाभार्थ्याला रुपया देखील मिळाला नसून, नगर परिषदेने केवळ कागदी घोडे नाचवले असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष महादेव गंगणे पाटील यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी प्रशासनाला तीव्र जाब विचारला आहे. प्रसिद्धीचा स्टंट, प्रत्यक्षात लाभार्थी वंचित महादेव गंगणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे नगर परिषदेच्या कारभारावर तीव्र आक्षेप घेतला आहे. नगर परिषदेने काही दिवसांपूर्वी रमाई आवास योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर निधी वाटप केल्याचा दावा प्रसिद्धी माध्यमांद्वारे केला होता. मात्र, प्रत्यक्षात जेव्हा लाभार्थ्यांनी त्यांच्या बँक खात्यांची तपासणी केली, तेव्हा त्यांच्या हाती निराशाच आली. अनेक गरीब आणि गरजू लाभार्थी अद्यापही पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्यापासून वंचित आहे...

 ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्यांचे उपजिल्हाधिकारी यांना निवेदन    

अंबाजोगाई (वसुदेव शिंदे)...समस्त ब्राह्मण समाजाच्या मागण्यासाठी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.


 समस्त ब्राम्हण समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी उपजिल्हाधिकारी कार्यलय अंबाजोगाई येथे निवेदन देण्यात आले. या निवेदनाचे वाचन शैलेश कुलकर्णी यांनी केले या वेळी संजय देशपांडे, अनिरुध्द चौसळकर,पडमनाभ देशपांडे, अभय जोशी,डॉ दिलीप कुलकर्णी, भास्कर देशपांडे,मिलिंद कुलकर्णी, विवेक वालेकर, ॲड स्वानंद कन्नडकर,सुभाष देशपांडे आणि मोठ्या प्रमाणात समस्त ब्रह्मवृंद उपस्थित होते.

मागण्या   परशूराम महामंडळासाठी पाचशे कोटींची तरतूद करणे.   प्रत्येक जिल्ह्यात परशुराम भवन नावाने ब्राह्मण विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे बांधून देने.  ब्राह्मण समाजातील मुलामुलींना उच्च शिक्षण मोफत करावे .  श्रीवर्धन येथील श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे स्मारकाचे नुतनीकरण करणे.  सिबीएससी स्टेट बोर्ड यांच्या पुस्तकात श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्यावर आधारित धडा समाविष्ठ करणे.

   पुरोहित व पुजारी याना मासिक दहा हजार रुपये मानधन देण्यात यावे.  स्वातंत्र्यवीर सावकार याना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा . शनिवारवाडा येथील दर्गा तात्काळ काढून वाड्याची डागडुजी करण्यात यावी.चिपळुण येथील भगवान परशुराम मंदिराला विशेष धार्मिक स्थळाचा दर्जा द्यावा.ब्राम्हण समाजातील शेतकऱ्यांना शेतीसाठी अवजारे, ट्रॅक्टर साठी अनुदान देण्यात यावे.ब्राम्हण समाजाच्या कुळात गेलेल्या जमीनी परत कराव्यात..या वरिल सर्व मागण्यांच्या संदर्भात मार्चमध्ये येणाऱ्या बजेटमध्ये निर्णय घ्यावा अशी विनंती सह निवेदन देण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....