कल्याणी....!!!. ...... पहा: सर्व काही वरील... पंकजाताई चा संपूर्ण पॉडकास्ट

इमेज
"राजकारणाने मला निवडले; बाबांचे जाणे आयुष्याला कलाटणी देणारे ठरले" - पंकजाताई मुंडे  "मला कधीच राजकारणात यायचे नव्हते. माझी स्वतःची वेगळी स्वप्ने होती. बाबा असताना परिस्थिती अशी आली की एका दिवसांत सगळं बदललं आणि मी राजकारणात आले. मात्र ३ जून २०१४ रोजी घडलेल्या एका घटनेने माझे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. परिस्थिती अशी निर्माण झाली की, मी राजकारण निवडले नाही तर राजकारणानेच मला निवडले," अशी भावनिक प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजाते मुंडे यांनी एका विशेष मुलाखतीत व्यक्त केली.    दिवंगत नेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देताना पंकजाताई मुंडे यांनी त्यांच्या निधनानंतरच्या संघर्षाचा, राजकारणातील प्रवासाचा आणि वडिलांकडून मिळालेल्या संस्कारांचा भावनिक प्रवास उलगडला. पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, ३ जून २०१४ हा दिवस त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणासाठीही अत्यंत धक्कादायक ठरला. "त्या दिवशी बाबांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. घरात आनंदाचे वातावरण होते. आईने कार्यक्रमासाठी पैठणी तयार ठेवली होती, मीदेखील नवीन पोशाख काढून ...

 देशातील युवकांनी राष्ट्र विकासासाठी योगदान द्यावे:- भागवत मसने

अंबाजोगाई ( वसुदेव शिंदे):- देशातील युवकांनी राष्ट्र विकासासाठी योगदान द्यावे असे मत जेष्ठ टीकाकार तथा सुप्रसिद्ध कवी भागवत मसने यांनी व्यक्त केले. ते युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त  टी.बी.गिरवलकर पॉलिटेक्निकल महाविद्यालयात  'राष्ट्रीय युवा दिनाच्या अनुषंगाने आयोजित व्याख्यान मालेत बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य एल व्ही बगले, विभागप्रमुख प्रा. व्ही व्ही कन्नूर, श्रीमती ए ए कुलकर्णी, कु रेणुका डबीर, व्ही व्ही रावबावले, ग्रंथपाल आर बी चव्हाण उपस्थित होते. 

          कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन तसेच स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्प  व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. प्रमुख अतिथींच्या स्वागतानंतर कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्य बगले यांनी केले. तर अतिथींच्या परिचय कु क्षितिजा आगळे यानी केला.

            प्रमुख अतिथी टीकाकार तथा कवी भागवत मसने यांनी स्वामी विवेकानंद यांच्यावर बोलताना स्वामी विवेकानंदाची मातृभूमी प्रति असलेली ओढ, राष्ट्र प्रेमासाठी केलेला असीम त्याग त्याचबरोबर त्यांची  समाजाप्रति असलेली कणव याबाबत उपस्थित विद्यार्थी तथा प्राध्यापक यांच्यासमोर उलगडून सांगितली. स्वामी विवेकानंद यांची समाजासाठीची आपली बांधिलकी समर्पण तसेच दिन दुबळ्या प्रति असलेला दयाभाव या सर्व उत्तमोत्तम गुणांना वर्तमानातील युवकांनी अंगीकारून समाजासाठीची बांधिलकी जोपासण्याचे आवाहन भागवत मसने यांनी केले. स्वामी विवेकानंदाचे चरित्र व युवकांप्रती असलेल्या कविता, वात्रटिका, यांची सांगड घालून विद्यार्थ्यांना मनोरंजनात्मक 

मार्गदर्शन केले.

        स्वामी विवेकानंद यांनी भारतभ्रमण करतांना त्यांना आलेल्या अनुभवांवरून समाजीक बांधिलकी जोपासना करण्यासाठी तसेच उन्नतीसाठी अखंड परिश्रम घेतले. देशाचे भवितव्य हे येणाऱ्या युवा पीढीवर निर्भर असते त्यामुळे युवकांनी देखील आपल्या राष्ट्र विकासासाठी बहुमूल्य असे योगदान देण्याचे मार्मिक आवाहन स्वामी विवेकानंद यांनी   युवकांना केल्याचे सुप्रसिद्ध कवी भागवत मसने यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी टी बी गिरवलकर पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच प्राध्यापक वृद यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास उपस्थित सर्व प्रमुख अतिथीचे आभार  समाधान छञे यांनी व्यक्त केले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या