दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

महादेव मुंडे हत्या प्रकरण: जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी नियुक्त केलं स्वतंत्र तपास पथक

बीड जिल्ह्यातील परळी येथील व्यावसायिक महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत हे आता एक्षण मोडवर आले असून या तपासा साठी त्यांनी तपास पथकाची नियुक्ती केली आहे.


महादेव मुंडे यांच्या हत्येला 16 महिने उलटूनही आरोपी मोकाट फिरत आहेत. या प्रकरणी त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे या आक्रमक झाल्या आसून न्यायासाठी आता किती दिवस वाट बघायची?, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी पोलिसांना आरोपींना पकडण्यासाठी १० दिवसांची मुदत दिली आहे, अन्यथा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. महादेव मुंडे यांचा खून करून मृतदेह तहसील कार्यालयाच्या आवारात टाकण्यात आला होता. या घटनेला आता 16 महिने उलटले, तरीही तपास लागलेला नाही.

ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मंगळवारी आपल्या मुलांसह पोलिस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली होती. त्यांनी पोलिस अधीक्षक नवनीत काँवत कार्यालयात नसल्याने तेथेच ठिय्या मांडला होता. पुढील १० दिवसांत या गुन्ह्याचा तपास झाला नाही, तर थेट पोलिस अधीक्षक कार्यालयातच उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. अशात पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी मोठा निर्णय घेतलाय.


पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी महादेव मुंडे प्रकरणाच्या तपासासाठी 5 सदस्यीय पथकाची नेमणूक केली आहे. ज्ञानेश्वरी मुंडे यांनी त्यांची भेट घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास तातडीने एसआयटी किंवा सीआयडी कडे देण्याची मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली होती.


या हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नवनीत काँवत यांनी पथक स्थापन केले असून या पथकात एक पोलीस निरीक्षक आणि चार कॉन्स्टेबल चा समावेश असणार आहे. एलसीबी चे पी आय म्हणून काम केलेले संतोष साबळे यांच्यासह चार पोलिस कर्मचारी हे आती या प्रकरणाचा तपास करणार आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट