इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

महादेव मुंडे हत्या प्रकरण: जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी नियुक्त केलं स्वतंत्र तपास पथक

बीड जिल्ह्यातील परळी येथील व्यावसायिक महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत हे आता एक्षण मोडवर आले असून या तपासा साठी त्यांनी तपास पथकाची नियुक्ती केली आहे.


महादेव मुंडे यांच्या हत्येला 16 महिने उलटूनही आरोपी मोकाट फिरत आहेत. या प्रकरणी त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे या आक्रमक झाल्या आसून न्यायासाठी आता किती दिवस वाट बघायची?, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी पोलिसांना आरोपींना पकडण्यासाठी १० दिवसांची मुदत दिली आहे, अन्यथा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. महादेव मुंडे यांचा खून करून मृतदेह तहसील कार्यालयाच्या आवारात टाकण्यात आला होता. या घटनेला आता 16 महिने उलटले, तरीही तपास लागलेला नाही.

ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मंगळवारी आपल्या मुलांसह पोलिस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली होती. त्यांनी पोलिस अधीक्षक नवनीत काँवत कार्यालयात नसल्याने तेथेच ठिय्या मांडला होता. पुढील १० दिवसांत या गुन्ह्याचा तपास झाला नाही, तर थेट पोलिस अधीक्षक कार्यालयातच उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. अशात पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी मोठा निर्णय घेतलाय.


पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी महादेव मुंडे प्रकरणाच्या तपासासाठी 5 सदस्यीय पथकाची नेमणूक केली आहे. ज्ञानेश्वरी मुंडे यांनी त्यांची भेट घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास तातडीने एसआयटी किंवा सीआयडी कडे देण्याची मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली होती.


या हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नवनीत काँवत यांनी पथक स्थापन केले असून या पथकात एक पोलीस निरीक्षक आणि चार कॉन्स्टेबल चा समावेश असणार आहे. एलसीबी चे पी आय म्हणून काम केलेले संतोष साबळे यांच्यासह चार पोलिस कर्मचारी हे आती या प्रकरणाचा तपास करणार आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या