इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...

शरद पवार पक्षाकडून सवाल !

परळी नगरपालिकेचं नेमकं चाललयं काय? नगर पालिकेकडून महाशिवरात्री निमित्त कार्यक्रम आयोजित केलेत की नाही ?

परंपरेप्रमाणे विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे - अँड जीवनराव देशमुख


परळी वैजनाथ दि.२३ (प्रतिनिधी)

           नगरपालिकेच्या स्थापनेपासून महाशिवरात्री निमित्त शहरात कुस्त्यांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते पण यंदा नगरपालिकेने आणखीनही कोणते कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत याची माहिती दिली नाही. महाशिवरात्री दोन दिवसांवर आलेली असताना एकही कार्यक्रम आयोजित केला नाही,तो परंपरेप्रमाणे आयोजित करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष अँड जीवनराव देशमुख यांनी केली आहे.

            बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग शहरात आहे. अनादी काळापासून महाशिवरात्री महोत्सव साजरा केला जातो. यामध्ये येथील नगरपालिकेच्या स्थापनेपासून नगरपालिकेच्या वतीने या शिवरात्री महोत्सवानिमित्त जंगी कुस्त्यांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदा प्रशासक म्हणून मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे आहेत यांनी या कार्यक्रमांचे आयोजन करणे आवश्यक आहे. तसेच काय कार्यक्रम आयोजित केले आहेत याची माहिती शहरवासीयांना देणे गरजेचे आहे. अवघ्या दोन दिवसांवर महाशिवरात्री महोत्सव साजरा होत असताना नगरपालिकेने मात्र अद्यापही कोणत्याही कार्यक्रमांची घोषणा केलेली नाही. इतर सामाजिक संस्था, मंदिर प्रशासन यांनी विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पण नगरपालिका मात्र झोपेचे सोंग घेत आहे. नगरपालिकेने लवकरात लवकर जंगी कुस्त्यांसह विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित करावेत तसेच शहरात मुख्य रस्त्यासह मंदिराकडे जाणाऱ्या विविध रस्त्यावरील लाईट बंद आहेत त्या दुरुस्त कराव्यात कारण परळीकर नागरिक, महिला मोठ्या संख्येने रात्री, अपरात्री या कालावधीत दर्शनासाठी जात असतात यासाठी सर्व पोलवरील लाईट दुरुस्त कराव्यात अशी मागणी अँड जीवनराव देशमुख यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....