इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

शरद पवार पक्षाकडून सवाल !

परळी नगरपालिकेचं नेमकं चाललयं काय? नगर पालिकेकडून महाशिवरात्री निमित्त कार्यक्रम आयोजित केलेत की नाही ?

परंपरेप्रमाणे विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे - अँड जीवनराव देशमुख


परळी वैजनाथ दि.२३ (प्रतिनिधी)

           नगरपालिकेच्या स्थापनेपासून महाशिवरात्री निमित्त शहरात कुस्त्यांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते पण यंदा नगरपालिकेने आणखीनही कोणते कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत याची माहिती दिली नाही. महाशिवरात्री दोन दिवसांवर आलेली असताना एकही कार्यक्रम आयोजित केला नाही,तो परंपरेप्रमाणे आयोजित करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष अँड जीवनराव देशमुख यांनी केली आहे.

            बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग शहरात आहे. अनादी काळापासून महाशिवरात्री महोत्सव साजरा केला जातो. यामध्ये येथील नगरपालिकेच्या स्थापनेपासून नगरपालिकेच्या वतीने या शिवरात्री महोत्सवानिमित्त जंगी कुस्त्यांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदा प्रशासक म्हणून मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे आहेत यांनी या कार्यक्रमांचे आयोजन करणे आवश्यक आहे. तसेच काय कार्यक्रम आयोजित केले आहेत याची माहिती शहरवासीयांना देणे गरजेचे आहे. अवघ्या दोन दिवसांवर महाशिवरात्री महोत्सव साजरा होत असताना नगरपालिकेने मात्र अद्यापही कोणत्याही कार्यक्रमांची घोषणा केलेली नाही. इतर सामाजिक संस्था, मंदिर प्रशासन यांनी विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पण नगरपालिका मात्र झोपेचे सोंग घेत आहे. नगरपालिकेने लवकरात लवकर जंगी कुस्त्यांसह विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित करावेत तसेच शहरात मुख्य रस्त्यासह मंदिराकडे जाणाऱ्या विविध रस्त्यावरील लाईट बंद आहेत त्या दुरुस्त कराव्यात कारण परळीकर नागरिक, महिला मोठ्या संख्येने रात्री, अपरात्री या कालावधीत दर्शनासाठी जात असतात यासाठी सर्व पोलवरील लाईट दुरुस्त कराव्यात अशी मागणी अँड जीवनराव देशमुख यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!