इमेज
  दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी दिपक गोविंद गित्ते  इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो येथे सिलेक्शन  परळी ( प्रतिनिधी) दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी चिरंजीव दीपक गोविंदराव गित्ते यांची मध्यप्रदेश भोपाल येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो या खेळामध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल शाळेचे प्रेरणास्थान मार्गदर्शक मा. श्री .किरण गित्ते साहेब IAS सचिव : सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, उद्योग व वाणिज्य विभाग त्रिपुरा सरकार,  विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्षा : सौ.उषाताई किरण गित्ते , शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. श्रीकांत पाटील सर यांनी गोविंद गित्ते कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .  या स्पर्धा मध्य प्रदेश भोपाल येथे इंटरनॅशनल या स्पर्धा दिनांक 12 मे 2026 रोजी होणार आहेत.           मराठवाड्यातील  नामांकित दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलने आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना खेळामध्ये महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले असून आता दीपक गोविंदराव गित्ते या विद्यार्थ्य...

१० ते १२ हजार मजुरांवर बेरोजगार होण्याचा धोका !

१० ते १२ हजार मजुरांवर बेरोजगार होण्याचा धोका !

आम्हाला राख मोफत द्या अन्यथा ५ मार्च पासून उपोषण-वीटभट्टी चालक व मजूरांचा इशारा

परळी वैजनाथ  प्रतिनिधी...

       सध्या संपूर्ण राज्यामध्ये परळीच्या औष्णिक विद्युत केंद्राचा राखचा विषय जोरदार चर्चेत असतानाच या राखेवर  आधारित परळी व परिसरातील अनेक व्यवसायांवर कुऱ्हाड चालवली जात असल्याचेही एक वास्तव आहे.या राखे मधून चालणारे छोटे छोटे उद्योग व व्यावसायिक अडचणीत आले आहेत.परळी व परिसरात चालवल्या जाणाऱ्या वीट भट्टी चालकांसह या वीटभट्ट्यांवर काम करणारे जवळपास दहा ते बारा हजार मजूर बेरोजगार होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हे उद्योग व व्यवसाय वाचविण्यासाठी केंद्र शासनाच्या सन २००२ च्या धोरणानुसार वीटभट्टी धारकांना मोफत राख द्यावी अशी मागणी आता पुढे आली आहे.

      परळी व परिसरात मोठ्या प्रमाणावर वीट उद्योग आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार या भागात निर्माण झालेला आहे.वीट उद्योगासाठी औष्णिक विद्युत केंद्रातील राख अत्यंत उपयुक्त असल्याने दर्जेदार वीट बनते. त्यामुळे परळीच्या वीटेला महाराष्ट्रासह परराज्यातील मोठी मागणी आहे. मात्र सध्या हा उद्योग अडचणीत आला आहे. वीट बनविण्यासाठी जी राख लागते तिचा दर दिवसेंदिवस वाढत असुन यापुर्वी जी राख केंद्र शासनाच्या सन २००२ सालच्या धोरणानुसार मोफत मिळायची, तिच राख आता १५ हजार रुपये हायवा इतक्या जास्त दराने मिळत आहे. त्यामुळे वीटउद्योग चालविणे कठिण बनल्याचे दिसुन येत आहे. लेबरचे दर, ट्रान्सपोर्टचे दर, कोळशाचे दर, राखेचे वाढलेले दर यामुळे हे व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे १०-१२ हजार मजूर व विटभट्टीचालक यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार आहे. 

       याबाबत परळी येथील वीटभट्टी चालक व मजूरांनी प्रशासनाला निवेदन दिले असुन वीटभट्ट्यांना मिळणारी राख ही सन २००२ सालच्या केंद्र शासनाच्या धोरणानुसार पुर्ववत मोफत मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा  विटभट्टी चालक व मजूर परळी उपविभागीय  कार्यालयासमोर दि.०५.०३.२०२५ पासून उपोषणास बसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....