इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील नवीन भारताचा नवा नकाशा

सर्व घटकांना न्याय देणारा परिपूर्ण अर्थसंकल्प !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील नवीन भारताचा नवा नकाशा


ना. पंकजाताई मुंडे यांनी केले केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत


मुंबई ।दिनांक ०१।

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात देशातील शेतकरी, शेतमजूर, तरूण वर्ग, महिला अशा सर्व समावेशक घटकांचा विचार करण्यात आला आहे. हा अर्थसंकल्प सर्व सामान्य घटकांना न्याय देणारा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील नवीन भारताचा नवा नकाशा समोर ठेवणारा आहे अशी शब्दांत राज्याच्या पर्यावरण, वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.

    अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेची घोषणा करण्यात आली आहे.सरकार ही योजना राज्यांसोबत चालवणार आहे. १.७ कोटी शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. याचा देशातील १०० जिल्ह्यांना फायदा होणार आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ५ लाख रुपयांचे पॅकेज, किसान क्रेडिट कार्डच्या कर्जाची मर्यादा आता 3  लाखांवरून 5 लाख रूपये करण्यात आली आहे. किसान क्रेडिट कार्ड द्वारे 7 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना सुलभ कर्ज सुविधा मिळणार आहे.  सर्व जिल्हयामध्ये जिल्हा रूग्णालयात कॅन्सर डे केअर सेंटर, 36 जीवरक्षक औषधी करमुक्त, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय यासाठी पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज आदींसाठी यात तरतूद करण्यात आली आहे.

         अर्थसंकल्पात नव्या करप्रणालीची घोषणा करण्यात आली आहे.त्यानुसार १२ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होणार आहे. त्याचसोबत पुढील सर्व टॅक्स स्लॅब्जमध्येही  बदल केले असून त्यानुसार करदात्यांना भराव्या लागणाऱ्या करात सूट मिळाली आहे. त्यामुळे करदात्यांसाठी हा अर्थसंकल्प मोठा दिलासा देणारा आहे. या अर्थसंकल्पामुळे सामान्य माणसाची खर्च करण्याची क्षमता वाढेल. देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर वाढवणे, सर्वसमावेशक विकास सुनिश्चित करताना खाजगी क्षेत्रातील गुंतवणूक वाढवणे, देशांतर्गत भावना उंचावणे आणि वाढत्या मध्यमवर्गाची खर्च क्षमता वाढवणे या अर्थसंकल्पाचे उद्दिष्ट असल्याचे ना. पंकजाताई यांनी सांगितले.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या