दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील नवीन भारताचा नवा नकाशा

सर्व घटकांना न्याय देणारा परिपूर्ण अर्थसंकल्प !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील नवीन भारताचा नवा नकाशा


ना. पंकजाताई मुंडे यांनी केले केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत


मुंबई ।दिनांक ०१।

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात देशातील शेतकरी, शेतमजूर, तरूण वर्ग, महिला अशा सर्व समावेशक घटकांचा विचार करण्यात आला आहे. हा अर्थसंकल्प सर्व सामान्य घटकांना न्याय देणारा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील नवीन भारताचा नवा नकाशा समोर ठेवणारा आहे अशी शब्दांत राज्याच्या पर्यावरण, वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.

    अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेची घोषणा करण्यात आली आहे.सरकार ही योजना राज्यांसोबत चालवणार आहे. १.७ कोटी शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. याचा देशातील १०० जिल्ह्यांना फायदा होणार आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ५ लाख रुपयांचे पॅकेज, किसान क्रेडिट कार्डच्या कर्जाची मर्यादा आता 3  लाखांवरून 5 लाख रूपये करण्यात आली आहे. किसान क्रेडिट कार्ड द्वारे 7 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना सुलभ कर्ज सुविधा मिळणार आहे.  सर्व जिल्हयामध्ये जिल्हा रूग्णालयात कॅन्सर डे केअर सेंटर, 36 जीवरक्षक औषधी करमुक्त, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय यासाठी पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज आदींसाठी यात तरतूद करण्यात आली आहे.

         अर्थसंकल्पात नव्या करप्रणालीची घोषणा करण्यात आली आहे.त्यानुसार १२ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होणार आहे. त्याचसोबत पुढील सर्व टॅक्स स्लॅब्जमध्येही  बदल केले असून त्यानुसार करदात्यांना भराव्या लागणाऱ्या करात सूट मिळाली आहे. त्यामुळे करदात्यांसाठी हा अर्थसंकल्प मोठा दिलासा देणारा आहे. या अर्थसंकल्पामुळे सामान्य माणसाची खर्च करण्याची क्षमता वाढेल. देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर वाढवणे, सर्वसमावेशक विकास सुनिश्चित करताना खाजगी क्षेत्रातील गुंतवणूक वाढवणे, देशांतर्गत भावना उंचावणे आणि वाढत्या मध्यमवर्गाची खर्च क्षमता वाढवणे या अर्थसंकल्पाचे उद्दिष्ट असल्याचे ना. पंकजाताई यांनी सांगितले.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....