इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

 संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी

अंबाजोगाई (वसुदेव शिंदे):-

बंजारा समाजाचे आराध्य दैवत व महान समाजसुधारक श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाच्या वतीने सेवालाल महाराज चौक , अंबाजोगाई येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी श्री संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. .

या कार्यक्रमाला भाजपाचे युवा नेते अक्षयभैय्या मुंदडा, अ.भा. बंजारा क्रांती दलाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मधुकरभाऊ राठोड, जिल्हा परिषद सदस्य बालासाहेब शेप, सरपंच आरडी नायक, पवन चव्हाण, साहेबराव पवार, मधुकर जाधव, अजय जाधव अजय राठोड, प्रकाश आडे, शेषराव आडे, बाबा आडे, सुरेश आडे, नवनाथ राठोड, कृष्णा आडे राष्ट्रीय महासचिव शरदभाऊ राठोड, तसेच स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बंजारा समाजातील अनेक नागरिक उपस्थित होते. सरपंच भाऊसाहेब राठोड यांचीही या वेळी विशेष उपस्थिती होती.

संत सेवालाल महाराज यांनी आपल्या आयुष्यभर बंजारा समाजाच्या उत्थानासाठी योगदान दिले. त्यांचा जीवनसंघर्ष, समाज सुधारण्यासाठी घेतलेली मेहनत आणि त्यांचे तत्त्वज्ञान आजही समाजासाठी मार्गदर्शक ठरत आहे. त्यांनी समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित विचारांचा प्रसार केला.

कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी आपल्या भाषणांतून संत सेवालाल महाराजांच्या शिकवणीचा उजाळा दिला. मधुकरभाऊ राठोड यांनी सांगितले की, "सेवालाल महाराज यांनी समाजात एकता, बंधुता आणि निस्वार्थ सेवा करण्याचा संदेश दिला आहे. आपण त्यांच्या विचारांचा आदर्श ठेवून समाज उन्नतीसाठी काम केले पाहिजे."

भाजपाचे युवा नेते अक्षयभैय्या मुंदडा यांनीही आपल्या भाषणात संत सेवालाल महाराजांचे विचार आजच्या काळातही तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले. "आजच्या तरुण पिढीने त्यांचा आदर्श घेऊन समाजाच्या विकासासाठी पुढे आले पाहिजे," असे ते म्हणाले.

शरदभाऊ राठोड यांनीही संत सेवालाल महाराज यांचे कार्य पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावे यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे नमूद केले. "त्यांच्या विचारांचा जागर केल्यास समाजात समरसता आणि बंधुता वाढीस लागेल," असे ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व मान्यवरांनी आणि नागरिकांनी श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सांगता जयघोषाने करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!