दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

 संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी

अंबाजोगाई (वसुदेव शिंदे):-

बंजारा समाजाचे आराध्य दैवत व महान समाजसुधारक श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाच्या वतीने सेवालाल महाराज चौक , अंबाजोगाई येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी श्री संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. .

या कार्यक्रमाला भाजपाचे युवा नेते अक्षयभैय्या मुंदडा, अ.भा. बंजारा क्रांती दलाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मधुकरभाऊ राठोड, जिल्हा परिषद सदस्य बालासाहेब शेप, सरपंच आरडी नायक, पवन चव्हाण, साहेबराव पवार, मधुकर जाधव, अजय जाधव अजय राठोड, प्रकाश आडे, शेषराव आडे, बाबा आडे, सुरेश आडे, नवनाथ राठोड, कृष्णा आडे राष्ट्रीय महासचिव शरदभाऊ राठोड, तसेच स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बंजारा समाजातील अनेक नागरिक उपस्थित होते. सरपंच भाऊसाहेब राठोड यांचीही या वेळी विशेष उपस्थिती होती.

संत सेवालाल महाराज यांनी आपल्या आयुष्यभर बंजारा समाजाच्या उत्थानासाठी योगदान दिले. त्यांचा जीवनसंघर्ष, समाज सुधारण्यासाठी घेतलेली मेहनत आणि त्यांचे तत्त्वज्ञान आजही समाजासाठी मार्गदर्शक ठरत आहे. त्यांनी समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित विचारांचा प्रसार केला.

कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी आपल्या भाषणांतून संत सेवालाल महाराजांच्या शिकवणीचा उजाळा दिला. मधुकरभाऊ राठोड यांनी सांगितले की, "सेवालाल महाराज यांनी समाजात एकता, बंधुता आणि निस्वार्थ सेवा करण्याचा संदेश दिला आहे. आपण त्यांच्या विचारांचा आदर्श ठेवून समाज उन्नतीसाठी काम केले पाहिजे."

भाजपाचे युवा नेते अक्षयभैय्या मुंदडा यांनीही आपल्या भाषणात संत सेवालाल महाराजांचे विचार आजच्या काळातही तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले. "आजच्या तरुण पिढीने त्यांचा आदर्श घेऊन समाजाच्या विकासासाठी पुढे आले पाहिजे," असे ते म्हणाले.

शरदभाऊ राठोड यांनीही संत सेवालाल महाराज यांचे कार्य पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावे यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे नमूद केले. "त्यांच्या विचारांचा जागर केल्यास समाजात समरसता आणि बंधुता वाढीस लागेल," असे ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व मान्यवरांनी आणि नागरिकांनी श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सांगता जयघोषाने करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....