इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

 संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी

अंबाजोगाई (वसुदेव शिंदे):-

बंजारा समाजाचे आराध्य दैवत व महान समाजसुधारक श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाच्या वतीने सेवालाल महाराज चौक , अंबाजोगाई येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी श्री संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. .

या कार्यक्रमाला भाजपाचे युवा नेते अक्षयभैय्या मुंदडा, अ.भा. बंजारा क्रांती दलाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मधुकरभाऊ राठोड, जिल्हा परिषद सदस्य बालासाहेब शेप, सरपंच आरडी नायक, पवन चव्हाण, साहेबराव पवार, मधुकर जाधव, अजय जाधव अजय राठोड, प्रकाश आडे, शेषराव आडे, बाबा आडे, सुरेश आडे, नवनाथ राठोड, कृष्णा आडे राष्ट्रीय महासचिव शरदभाऊ राठोड, तसेच स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बंजारा समाजातील अनेक नागरिक उपस्थित होते. सरपंच भाऊसाहेब राठोड यांचीही या वेळी विशेष उपस्थिती होती.

संत सेवालाल महाराज यांनी आपल्या आयुष्यभर बंजारा समाजाच्या उत्थानासाठी योगदान दिले. त्यांचा जीवनसंघर्ष, समाज सुधारण्यासाठी घेतलेली मेहनत आणि त्यांचे तत्त्वज्ञान आजही समाजासाठी मार्गदर्शक ठरत आहे. त्यांनी समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित विचारांचा प्रसार केला.

कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी आपल्या भाषणांतून संत सेवालाल महाराजांच्या शिकवणीचा उजाळा दिला. मधुकरभाऊ राठोड यांनी सांगितले की, "सेवालाल महाराज यांनी समाजात एकता, बंधुता आणि निस्वार्थ सेवा करण्याचा संदेश दिला आहे. आपण त्यांच्या विचारांचा आदर्श ठेवून समाज उन्नतीसाठी काम केले पाहिजे."

भाजपाचे युवा नेते अक्षयभैय्या मुंदडा यांनीही आपल्या भाषणात संत सेवालाल महाराजांचे विचार आजच्या काळातही तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले. "आजच्या तरुण पिढीने त्यांचा आदर्श घेऊन समाजाच्या विकासासाठी पुढे आले पाहिजे," असे ते म्हणाले.

शरदभाऊ राठोड यांनीही संत सेवालाल महाराज यांचे कार्य पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावे यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे नमूद केले. "त्यांच्या विचारांचा जागर केल्यास समाजात समरसता आणि बंधुता वाढीस लागेल," असे ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व मान्यवरांनी आणि नागरिकांनी श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सांगता जयघोषाने करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या