नियमित प्रशासकीय प्रक्रियेचाच भाग असल्याची बतावणी...

इमेज
  परळी औष्णिक वीज प्रकल्पातील एकाचवेळी १९ अधिकाऱ्यांच्या बदल्या; रिक्त पदांमुळे प्रकल्पाच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह परळी वैजनाथ : परळी येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील कार्यकारी अभियंत्यासह विविध महत्त्वाच्या पदांवरील तब्बल १९ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी जारी करण्यात आल्याने प्रकल्प परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्या जागी अद्याप एकाही नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नसल्याने प्रकल्पाच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी, परळी औष्णिक प्रकल्पाच्या भवितव्याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.            महानिर्मितीच्या परळी औष्णिक वीज केंद्रात गेल्या काही वर्षांपासून वीज निर्मितीची घट, जुन्या यंत्रणांची अवस्था आणि प्रकल्पाच्या भवितव्याबाबत वेळोवेळी चर्चा होत असतानाच आता मोठ्या प्रमाणावर झालेल्या बदल्यांनी या चर्चेला अधिकच खतपाणी घातले आहे. कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, रसायनशास्त्रज्ञ, सुरक्षा अ...

 शाळेचा निरोप घेतांना विद्यार्थ्यांनी शिक्षक व शाळेप्रती कृतज्ञ असावे-भागवत मसने

अंबाजोगाई (वसुदेव शिंदे):-इयता दहावी किंवा बारावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेतून निरोप घेतांना आपल्या शिक्षक व शाळांप्रति कृतघ्न असावे असा सल्ला सुप्रसिद्ध वात्रटिकार तथा शिक्षक भागवत मसने यांनी दिला. ते होळेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, होळ ता केज जिल्हा बिड येथे इयत्ता दहावी विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे संस्थापक परमपूज्य नारायण दादा काळदाते यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.  या निरोप समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून  भागवत मसने यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी सुधीर शिंदे महसूल सहाय्यक, मीरा राख कर सहाय्यक, कांचन हरगावकर जेल पोलीस हे देखील उपस्थित होते.

              या कार्यक्रम प्रसंगी बोलताना सुप्रसिद्ध वात्रटिका कार भागवत मसने म्हणाले की शालेय जीवना पासूनच शिक्षक,  शाळा विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या कलागुणांना वाव देतात. शाळेतील  प्रत्येक विषयाचे शिक्षक वेळोवेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. आणि पायाभूत स्तरापासूनच आपल्याला घडवण्याचे काम ते करतात  . त्यामुळेच विद्यार्थी हे शाळेतुन बाहेर पडल्यानंतर या सर्व बाबींचा बळावरच पुढे आपल्या आयुष्याची वाटचाल करत असतात. विद्यार्थ्यांनी  देखील आपण आपल्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत असताना शिक्षक व आपल्या शाळेप्रती कृतज्ञेची भावना सदोदित बाळगावी असा मार्मिक सल्ला उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना दिला.

              घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात ; माहेरी जा सुवासाची कर बरसात: आज याच भावनेने या शाळेचे माजी विद्यार्थी जे एम पी एस सी च्या पदावर नियुक्त झालेले  सुधीर शिंदे, महसूल सहाय्यक, मीरा राख, कर सहाय्यक/ महसूल सहाय्यक तर कांचन हरगावकर जेल पोलीस/मुंबई शहर पोलीस, शाळेच्या वतीने आपला सत्कार स्वीकारण्यासाठी आले असतील अशी आशा मसने यांनी व्यक्त केली. अशाच  सर्व यशस्वी विद्यार्थ्यांच्या वाटेवर आपण चालावे व आपले , पालकाचे व शाळेचे नाव उज्वल करावे असेही मत सुप्रसिद्ध वात्र टीकाकार कवी भागवत मसने यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर करत असताना भान ठेवावे. वारंवार सेल्फी काढल्याने आपल्या रूपात काहींही बदल होत नाही. सेल्फीनेच अनेक जीवांचा घात केला आहे. त्यामुळे या मोबाईलचा आपल्या जीवनात सकारात्मक व विधायक कामासाठीच विद्यार्थ्यांनी उपयोग करान्याचा सल्ला कवी भागवत मसने यांनी दिला. विद्यार्थी दशेतच आपले लक्ष्य ठरवून आपली प्रगती आपण साध्य करावी. तसेच मी आयुष्यात कधीच कॉपी करणार नाही हा संकल्प देखील आपल्या मनाशी दृढ करावा.निश्चितच यश आपल्या पदरात पडतअसे मसने यांनी सांगितले.

            या प्रसंगी व्यासपीठावर मुख्याध्यापक मलदोडे ,पालक सूर्यभान राख , ग्रंथपाल देशमुख मॅडम, केंद्रे मॅडम या उपस्थित होत्या. या निरोप समारंभाचे बहारदार असे सूत्रसंचालन राठोड सर यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या