परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

स्वा.सै. चिल्ले गौरव आंतरमहाविद्यालयीन  वक्तृत्व स्पर्धेत रूपाली साखरे प्रथम, लक्ष्मी जुनाळ द्वितीय व वैष्णवी गित्ते तृतीय       


       

परळी वैजनाथ-

      महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभेतर्फे नुकत्याच परळी येथे पार पडलेल्या स्वा.सै. मन्मथअप्पा   व सौ.कलावतीबाई चिल्ले गौरव आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. रूपाली संतोष साखरे ही प्रथम , वैद्यनाथ महाविद्यालयाची कु. लक्ष्मी महेश जुनाळ ही द्वितीय आली, तर तिसरा क्रमांक याच महाविद्यालयाच्या कु. वैष्णवी नागनाथ गित्ते हिने पटकावला. उत्तेजनार्थ पुरस्कारासाठी ऐश्वर्या जगन्नाथ पोटभरे, कोमल विनायक कराड, तेजस्विनी दत्तात्रय साबळे व चि. फरहान खान या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

          थोर समाजसुधारक महर्षी दयानंद सरस्वती यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त येथील आर्य समाजात आयोजित या वक्तृत्व स्पर्धा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर्य समाजाचे कोषाध्यक्ष श्री देविदासराव कावरे, तर प्रमुख पाहुणे म्हणून करनाल (हरियाणा) गुरुकुल आश्रमाचे आचार्य श्री स्वामी सोमानंद सरस्वती , महाराष्ट्र सभेचे कोषाध्यक्ष श्री रंगनाथ तिवार व आर्य समाजाचे उपप्रधान श्री लक्ष्मण आर्य गुरुजी उपस्थित  हे  उपस्थित होते.

          या राज्यस्तरीय स्पर्धेचे परीक्षण श्रद्धानंद गुरुकुल आश्रमाचे आचार्य श्री सत्येंद्रजी विद्योपासक,पं.प्रशांतकुमारजी शास्त्री व पं. योगराज भारती यांनी केले. या स्पर्धेसाठी "समग्र क्रांतीचे अग्रदूत महर्षी दयानंद व सद्य परिस्थितीत त्यांच्या विचारांची गरज !" हा विषय ठेवला होता विजेत्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे प्रथम (₹२०००/-), द्वितीय(₹१५००), तृतीय(₹१०००) व उत्तेजनार्थ (प्रत्येकी ₹ ५००/- ) अशी पारितोषिके मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आली. या स्पर्धेचे प्रास्ताविक लक्ष्मणराव आर्य  यांनी केले,संचलन अरुण चव्हाण यांनी केले तर आभार  सभेचे कोषाध्यक्ष श्री रंगनाथ तिवार यांनी मानले. आर्य कार्यकर्ते श्री गोवर्धन चाटे, डॉ.अरुण चव्हाण, डॉ .नयनकुमार आचार्य व रंगनाथ तिवार यांच्याकडून प्रत्येकी  ₹५००/- रुपयांची उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. यावेळी स्वामी सोमानंदजी यांनी सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यांनी महर्षी दयानंद सरस्वती यांच्या चरित्र व ग्रंथांचा अभ्यास करावा, असे आवाहन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!