दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

महाशिवरात्र पर्व: ज्योतिर्लिंग वैद्यनाथ

महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर परळी शहरात स्वच्छता मोहीम राबवा : व्यंकटेश शिंदे

महाशिवरात्रीपुर्वी जुन्या शनी मंदिर समोरील अनधिकृत अतिक्रमण काढा


परळी: (प्रतिनिधी) महाशिवरात्री निमित्त बारा ज्योतर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभु वैद्यनाथाच्या दर्शनासाठी देश भरातून लाखों भाविक येत असतात. महाशिवरात्री च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण  शहरात परळी नगर परिषदेच्या वतीने मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवून पथदिवे दुरुस्त करण्यात यावेत असे आवाहन शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे यांनी केले आहे. 


     परळी शहरात धुळीचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. धूळ मुक्त परळी करण्यासाठी परळी नगर परिषदेने ठोस पाऊले उचलावीत. महाशिवरात्री निमित्त प्रभु वैद्यनाथा च्या निघणाऱ्या पालखी मार्गावर शनी मंदिर समोर आतिषबाजी करण्यात येणाऱ्या ठिकाणी अनधिकृत अतिक्रमण होत असून त्यावर नगर परिषदेने कठोर कार्यवाही करावी. तथा संपूर्ण पालखी मार्ग खड्डे मुक्त करून स्वच्छ करावा. संपूर्ण शहरात जंतुनाशक फवारणी करण्यात यावी. शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा. महाशिवरात्री दरम्यान जड वाहतूक शहराच्या बाहेरून पर्यायी मार्गाने वळवावी. महाशिवरात्र सुरू होण्यापूर्वी वरील सर्व कामे पूर्ण करण्यात यावी अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे यांनी प्रसिध्दी पत्रका द्वारे केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....