कल्याणी....!!!. ...... पहा: सर्व काही वरील... पंकजाताई चा संपूर्ण पॉडकास्ट

इमेज
"राजकारणाने मला निवडले; बाबांचे जाणे आयुष्याला कलाटणी देणारे ठरले" - पंकजाताई मुंडे  "मला कधीच राजकारणात यायचे नव्हते. माझी स्वतःची वेगळी स्वप्ने होती. बाबा असताना परिस्थिती अशी आली की एका दिवसांत सगळं बदललं आणि मी राजकारणात आले. मात्र ३ जून २०१४ रोजी घडलेल्या एका घटनेने माझे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. परिस्थिती अशी निर्माण झाली की, मी राजकारण निवडले नाही तर राजकारणानेच मला निवडले," अशी भावनिक प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजाते मुंडे यांनी एका विशेष मुलाखतीत व्यक्त केली.    दिवंगत नेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देताना पंकजाताई मुंडे यांनी त्यांच्या निधनानंतरच्या संघर्षाचा, राजकारणातील प्रवासाचा आणि वडिलांकडून मिळालेल्या संस्कारांचा भावनिक प्रवास उलगडला. पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, ३ जून २०१४ हा दिवस त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणासाठीही अत्यंत धक्कादायक ठरला. "त्या दिवशी बाबांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. घरात आनंदाचे वातावरण होते. आईने कार्यक्रमासाठी पैठणी तयार ठेवली होती, मीदेखील नवीन पोशाख काढून ...

वाळु,राख, गौण खनिज उत्खनन आणि रेल्वे भूसंपादन...घेणार आढावा

 ना. पंकजा मुंडे उद्या बीडमध्ये ; जिल्हाधिकारी कार्यालयात घेणार बैठक

बीड जिल्ह्यातील अवैध वाळु उपसा, राखेची वाहतुक, अवैध गौण खनिज उत्खननाचा घेणार आढावा


धारुर येथील रेल्वे भू-संपादनाच्या मावेजा संदर्भातही घेणार बैठक


बीड ।दिनांक ०६।   

जिल्ह्यात गेल्या कांही महिन्यांपासून सुरू असलेला अवैध वाळु उपसा, राखेच्या वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण, अवैध गौण खनिज उत्खननामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास या सर्व जिव्हाळ्याच्या विषयावर राज्याच्या पर्यावरण, वातावरणीय बदल व पशूसंवर्धन मंञी ना. पंकजाताई मुंडे उद्या जिल्हाधिकारी कार्यालयात  आढावा बैठक घेणार असुन  सर्व अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

उद्या ( ता. ०७ ) सायंकाळी ४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली असुन जिल्हाधिकारी अविनाश पाठक  यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यात गेल्या कांही महिन्यांपासून अवैध वाळु उपसा मोठ्या प्रमाणात होत आहे.  त्याचप्रमाणे गौण खनिज उत्खननामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असुन अवैध डोंगर पोखरल्यामुळे पर्यावरणाची जी हानी होत त्यावर कुठे तरी प्रतिबंध येणे आवश्यक आहे. औष्णिक वीज केंद्रातुन बाहेर पडणाऱ्या राखेची अवैध पध्दतीने  वाहतुक होत असल्याने प्रदुषणातही वाढ झाली आहे. या सर्व बाबी  पर्यावरणाशी संबंधित असल्याने ना. पंकजाताई मुंडे या सर्व विषयाचा आढावा घेवुन संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देणार आहेत.


धारुर येथील रेल्वे भूसंपादनाच्या मावेजाची बैठक

------

अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेत वारंवार उद्भवणाऱ्या अडचणी सोडवून मावेजा मिळवुन द्यावा अशी मागणी करत धारूर तालुक्यातील कांही शेतकऱ्यांनी माजी खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांची आज भेट घेतली होती. या संदर्भात डॉ. प्रितमताई मुंडे यांनी ना.पंकजाताई मुंडे यांना पञ लिहून या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन निर्देश देण्याची मागणी केली होती, त्यानुसार उद्या सायंकाळी ४.४५ वा. वाजता महसूल विभाग, भूमीअभिलेख विभाग, कृषी विभाग आणि रेल्वे विभागाची संयुक्त बैठक ना. पंकजाताई मुंडे घेणार आहेत.

•••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या