इमेज
  ग्लोबल विकास ट्रस्ट आणि परळी नगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम; पथनाट्यातून दिला वृक्षसंगोपनाचा संदेश परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंगोपनाचा प्रभावी संदेश देण्यासाठी परळी शहरात आज एका विशेष जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. ग्लोबल विकासच ट्रस्ट, नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक वृक्षसंवर्धन चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आज, शुक्रवार २६ जून रोजी शहरातील प्रमुख आणि गजबजलेल्या भागात या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये मोंढा मार्केट, बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि नेहरू चौक तळ परिसराचा समावेश होता. या पथनाट्याला परळीकरांनी प्रचंड गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नाट्यातून दिला 'झाडे लावा, झाडे जगवा'चा संदेश वाढते प्रदूषण आणि निसर्गाचा बिघडत चाललेला समतोल या पार्श्वभूमीवर मानवी जीवनात वृक्षांचे काय महत्त्व आहे, हे कलाकारांनी आपल्या प्रभावी अभिनयातून मांडले. केवळ झाडे लावणे पुरेसे नसून त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज कशी बनली आहे, यावर पथनाट्यातून प्रकाश टाकण्यात आला. पाणीटंचाई, ग्लोबल वॉर्मिंग आण...

वैद्यनाथ कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर समारोप

 रा.से. यो. शिबिरातून युवकांनी स्वयंशिस्त अंगीकारावी- दत्ताआप्पा इटके 

शिस्तप्रिय विद्यार्थी हे समाजाचा आधार – प्राचार्या  . डॉ. चव्हाण 



वैद्यनाथ कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर समारोप 


परळी वैजनाथ – वैद्यनाथ कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना  विभागातर्फे आयोजित विशेष युवक युवती शिबिर शिबिराचा समारोप उत्साहात पार पडला. या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जव्हार एज्युकेशन सोसायटीचे सचिव आदरणीय श्री दत्ताआप्पा इटके गुरुजी होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्या सौ. डॉ. अर्चना चव्हाण,  उप प्राचार्य डॉ.व्ही. बी. गायकवाड,  उप प्राचार्य प्रा. डी. के. आंधळे,  डॉ. बी. व्ही. केंद्रे व विचार मंचावर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. माधव रोडे व  डॉ. भीमानंद गजभारे, श्री स्वामी सर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी   डॉ. गजभारे यांनी शिबिराची साध्य झालेली उद्दिष्टे सांगितली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात  श्री दत्ताआप्पा इटके गुरुजी यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या सामाजिक जाणीवेवर भर देत म्हटले की, "एनएसएस हे समाजकार्याचे एक उत्तम व्यासपीठ आहे. हे विद्यार्थ्यांना सेवा करण्याची संधी देते आणि त्यातून आयुष्यभराची शिदोरी मिळते. जीवनात यशस्वी होण्यासाठी चांगला स्वभाव अंगीकारणे आवश्यक आहे. आई-वडील हेच आपले पहिले दैवत आहेत, त्यामुळे त्यांची योग्य सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे. एनएसएसमधून आदर्श नेतृत्व घडते आणि यामुळे विद्यार्थी उत्तम नागरिक बनतात." कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्राचार्या  डॉ. अर्चना चव्हाण मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर भर दिला. "शिस्तप्रिय विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडवणे हे एनएसएसचे मुख्य उद्दिष्ट आहे. विद्यार्थ्यांनी चांगल्या गोष्टींचे मनात रेकॉर्डिंग ठेवावे, त्यामुळे त्यांची योग्य दिशा ठरते," असे मत त्यांनी व्यक्त केले. उपप्राचार्य  प्रा. डी. के. आंधळे सरांनी कर्मयोगाचे महत्त्व समजावत विद्यार्थ्यांना सकारात्मक संदेश दिला. "चांगले कर्म केल्यास आयुष्याला योग्य गती मिळते. उत्तम कर्माच्या आचरणामुळेच यश प्राप्त होते. त्यामुळे प्रत्येकाने कर्माच्या सिद्धांतावर चालावे," असे त्यांनी सांगितले. शिबिरतील सात दिवसात श्रमदानातून वसंत नगर परिसरात जल संवर्धन उपक्रमात अंधार कोळी डोंगर भागात मागण्या वर्षेच बंधार फुटल्या मुळे त्याची  दुरुस्ती केले. 30 लाख लिटर जल साठ वण क्षमता व वन्य पशु प्राण्यासाठी फुटलेल्या धरण दुरुस्ती  करून बंधार पुर्ननिर्मिती १२५ एन. एस. एस च्या विद्यार्थीनी केला. त्या स्वंयसेवकांचा श्रम गौरव जवाहर एज्युकेशन सोसायटी चे सचिव दत्ताप्पा ईटके यांच्या हस्ते स्मृती चिन्ह देऊन करण्यात आला.  याकार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. श्रीहरी गुटैॢ यांनी केले स्वयंसेवक प्रणव आघाव यांनी आभार मानले. या वेळी  ग्रंथपाल प्रा. डॉ. शंकर धांडे, प्रा. डॉ. सोमनाथ किरवले,  प्रा. डॉ. प्रमोद गीते, प्रा. दिलीप गायकवाड , प्रा. डी. आर. मुंडे उपस्थित होते. एन. एस. एस.  चे स्वयंसेवक  अभिजीत श्रीमंत रोडे, प्रणव आघाव, आकाश फड,  सक्षम सरवदे,  किरण गुट्टे, ओमकेश बांगर, संतोष घनघाव, महेश मुंडे, युवराज गीते, आरती शिंदे, संध्या रोडे, आफरीन पठाण, शितल मुंडे, नेहा आदोडे , नम्रता सरवदे, शुभांगी कांचनवाड, . मनिषा कातकडे , तेजस्वीनी साबळे आधी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षक आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या