इमेज
  ग्लोबल विकास ट्रस्ट आणि परळी नगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम; पथनाट्यातून दिला वृक्षसंगोपनाचा संदेश परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंगोपनाचा प्रभावी संदेश देण्यासाठी परळी शहरात आज एका विशेष जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. ग्लोबल विकासच ट्रस्ट, नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक वृक्षसंवर्धन चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आज, शुक्रवार २६ जून रोजी शहरातील प्रमुख आणि गजबजलेल्या भागात या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये मोंढा मार्केट, बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि नेहरू चौक तळ परिसराचा समावेश होता. या पथनाट्याला परळीकरांनी प्रचंड गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नाट्यातून दिला 'झाडे लावा, झाडे जगवा'चा संदेश वाढते प्रदूषण आणि निसर्गाचा बिघडत चाललेला समतोल या पार्श्वभूमीवर मानवी जीवनात वृक्षांचे काय महत्त्व आहे, हे कलाकारांनी आपल्या प्रभावी अभिनयातून मांडले. केवळ झाडे लावणे पुरेसे नसून त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज कशी बनली आहे, यावर पथनाट्यातून प्रकाश टाकण्यात आला. पाणीटंचाई, ग्लोबल वॉर्मिंग आण...

 सेवावृत्ती मेजर, रेशीमबंध, निरांजन, विनोद वारी पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन

डॉ.सुरेश खुरसाळे, सुनीता देशमुख, विजया मारोतकर वेदप्रकाश वेदालंकार यांच्या हस्ते होणार प्रकाशन


अंबाजोगाई - (वसुदेव शिंदे):-


शहरातील सौभाग्य मंगल कार्यालयात दि ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वा. अपर्णा कुलकर्णी व अश्विनी निवर्गी लिखित पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे .या प्रकाशन सोहळ्यास तुकाराम महाराज पुरस्कार प्राप्त वेदप्रकाश वेदालंकार यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक डॉ.सुरेश खुरसाळे, सुनीता देशमुख नागपुरच्या विजया मारोतकर व ख्यातनाम साहित्यिक वेदप्रकाश वेदालंकार हे उपस्थित राहणार आहेत.

सेवावृत्ती मेजर एस.पी. कुलकर्णी यांनी एनसीसीच्या माध्यमातून केलेले कार्य हे सेवावृत्ती मेजर या पुस्तकातील लेखाद्वारे घेऊन त्यातून जनजागृतीसाठी प्रकाश टाकला आहे.

 अपर्णा कुलकर्णी यांनी निरंजन, रेशीमबंध या पुस्तकातून नात्यातील उत्सव चारोळी हे विषय साधण्याचा प्रयत्न केला आहे निरंजन या काव्यसंग्रहातून कवितेद्वारे प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे तसेच विनोदवारी या पुस्तकातून समाज प्रबोधन करण्यात आले आहे या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे . लेखिका अपर्णा कुलकर्णी, अश्विनी निवर्गी यांनी स्वतःच्या लिहिलेल्या पुस्तकांनी आईची तुला करण्यात येणार आहे. पुस्तकाचे वाटप तुलेनंतर करण्यात येईल .अशी एक वेगळी मांडणी या कार्यक्रमात होणार आहे *.

श्रीमती विजया चपळगांवकर यांनी मुख्याध्यापिका म्हणून शैक्षणिक क्षेत्रात मोठे काम केले आहे ,शिस्त, काटेकोरपणा आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. अशा संयुक्त कार्यक्रमाचे  आयोजन अपर्णा  कुलकर्णी, अश्विनी निवर्गी,सीमा पांडे,भूषण क्षीरसागर यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या