इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

 बीड जिल्ह्यात रमजान महिन्यात विद्युत पुरवठा खंडित करू नका - अनिल बोर्डे



गेवराई( प्रतिनिधी) सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजानचा सुरू होणार असून या महिन्यात बीड जिल्ह्यातील वीज पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी बीड जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र चे उपाध्यक्ष तथा गेवराई ग्राहक पंचायत मार्गदर्शन केंद्र प्रमुख अनिल बोर्डे यांनी मा. कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य वितरण विभाग बीड व उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य वितरण उप विभाग गेवराई यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली आहे. 

     रविवार दिनांक 2 मार्चपासून सर्वत्र मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू होत आहे. या कालावधी मध्ये मुस्लिम( रोजा) उपवास ठेवतात. पहाटे सहेरी तर सायंकाळी रोजा इफ्तार करतात रात्री दीड ते दोन तास मजीद मध्ये  तराविहची विशेष नमाज करतात. कुर आन पठण करतात अशा प्रकारे या महिन्यात जास्तीत जास्त इबादत ( उपासना)  करतात त्यामुळे रमजान महिन्यात विजेची अत्यंत आवश्यकता असते या महिन्यात रात्री व दिवसा वीजपुरवठा खंडित झाल्यास गैरसोय निर्माण होते.                                        सध्या बीड जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे याचा सर्व जनतेला त्रास होत आहे. विशेष म्हणजे रमजान महिन्यामध्ये वीज पुरवठा बीड जिल्ह्यात खंडित होणार नाही याबाबत जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाने दक्षता घेऊन नियोजन करावे अशी मागणी बीड जिल्हा पंचायत उपाध्यक्ष अनिल बोर्डे व गेवराई ग्राहक पंचायत अध्यक्ष प्रा. भानुदास फलके यांनी निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या