परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

 बीड जिल्ह्यात रमजान महिन्यात विद्युत पुरवठा खंडित करू नका - अनिल बोर्डे



गेवराई( प्रतिनिधी) सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजानचा सुरू होणार असून या महिन्यात बीड जिल्ह्यातील वीज पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी बीड जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र चे उपाध्यक्ष तथा गेवराई ग्राहक पंचायत मार्गदर्शन केंद्र प्रमुख अनिल बोर्डे यांनी मा. कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य वितरण विभाग बीड व उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य वितरण उप विभाग गेवराई यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली आहे. 

     रविवार दिनांक 2 मार्चपासून सर्वत्र मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू होत आहे. या कालावधी मध्ये मुस्लिम( रोजा) उपवास ठेवतात. पहाटे सहेरी तर सायंकाळी रोजा इफ्तार करतात रात्री दीड ते दोन तास मजीद मध्ये  तराविहची विशेष नमाज करतात. कुर आन पठण करतात अशा प्रकारे या महिन्यात जास्तीत जास्त इबादत ( उपासना)  करतात त्यामुळे रमजान महिन्यात विजेची अत्यंत आवश्यकता असते या महिन्यात रात्री व दिवसा वीजपुरवठा खंडित झाल्यास गैरसोय निर्माण होते.                                        सध्या बीड जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे याचा सर्व जनतेला त्रास होत आहे. विशेष म्हणजे रमजान महिन्यामध्ये वीज पुरवठा बीड जिल्ह्यात खंडित होणार नाही याबाबत जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाने दक्षता घेऊन नियोजन करावे अशी मागणी बीड जिल्हा पंचायत उपाध्यक्ष अनिल बोर्डे व गेवराई ग्राहक पंचायत अध्यक्ष प्रा. भानुदास फलके यांनी निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!