इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

 छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा तरुणांनी आदर्श घ्यावा- प्रा. डी. के. आंधळे

 परळी प्रतिनिधी..... जवहार शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये रयतेचे राजे व बहुजन समाजाचे उद्धारक छत्रपती शिवाजी महाराजांची 395 वी जयंती साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डी के आंधळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा तरुणांनी आदर्श घ्यावा असे गौरव उद्गार याप्रसंगी काढले. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए आर चव्हाण, प्राध्यापक प्रतिनिधी  व विद्या परिषद सदस्य,डॉ पी एल कराड, उप प्राचार्य डॉ. व्ही. गायकवाड व प्रा.डी के आंधळे, डॉ बी के शेप यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात इतिहास विभाग प्रमुख डॉ. बी.के शेप यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावर थोडक्यात प्रकाश टाकला. तर प्रमुख पाहुणे प्रा.डी के आंधळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेच्या संदर्भात विस्तृत मांडणी केली. व छत्रपती शिवाजी महाराज  राज्यकारभार कशा पद्धतीने चालवीत होते याचे विविध उदाहरणे दिली. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी  प्रशासकीय यंत्रणा योग्य रीतीने वापरली होती असेही सांगितले. अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाच्या प्राचार्या,डॉ. चव्हाण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रजेवरील अन्यायाविरुद्ध लढून नेहमीच लोकांचे कल्याण केले.  छत्रपती शिवाजी महाराज हे एक मराठा योद्धा आणि पश्चिम भारतातील मराठा साम्राज्याचे संस्थापक शासक होते. त्यांना अजूनही भारत आणि इतर देशांमध्ये त्यांच्या काळातील सर्वात महान योद्धा मानले जाते. ते एक लष्करी रणनीतीकार, कार्यक्षम प्रशासक आणि शूर योद्धा म्हणून ओळखले जातात.त्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन  मराठा साम्राज्याची स्थापना केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इतिहास विभाग प्रमुख डॉ. बी.के शेप तर आभार डॉ भीमानंद गजभारे यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या