इमेज
  दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी दिपक गोविंद गित्ते  इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो येथे सिलेक्शन  परळी ( प्रतिनिधी) दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी चिरंजीव दीपक गोविंदराव गित्ते यांची मध्यप्रदेश भोपाल येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो या खेळामध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल शाळेचे प्रेरणास्थान मार्गदर्शक मा. श्री .किरण गित्ते साहेब IAS सचिव : सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, उद्योग व वाणिज्य विभाग त्रिपुरा सरकार,  विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्षा : सौ.उषाताई किरण गित्ते , शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. श्रीकांत पाटील सर यांनी गोविंद गित्ते कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .  या स्पर्धा मध्य प्रदेश भोपाल येथे इंटरनॅशनल या स्पर्धा दिनांक 12 मे 2026 रोजी होणार आहेत.           मराठवाड्यातील  नामांकित दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलने आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना खेळामध्ये महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले असून आता दीपक गोविंदराव गित्ते या विद्यार्थ्य...

 छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा तरुणांनी आदर्श घ्यावा- प्रा. डी. के. आंधळे

 परळी प्रतिनिधी..... जवहार शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये रयतेचे राजे व बहुजन समाजाचे उद्धारक छत्रपती शिवाजी महाराजांची 395 वी जयंती साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डी के आंधळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा तरुणांनी आदर्श घ्यावा असे गौरव उद्गार याप्रसंगी काढले. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए आर चव्हाण, प्राध्यापक प्रतिनिधी  व विद्या परिषद सदस्य,डॉ पी एल कराड, उप प्राचार्य डॉ. व्ही. गायकवाड व प्रा.डी के आंधळे, डॉ बी के शेप यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात इतिहास विभाग प्रमुख डॉ. बी.के शेप यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावर थोडक्यात प्रकाश टाकला. तर प्रमुख पाहुणे प्रा.डी के आंधळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेच्या संदर्भात विस्तृत मांडणी केली. व छत्रपती शिवाजी महाराज  राज्यकारभार कशा पद्धतीने चालवीत होते याचे विविध उदाहरणे दिली. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी  प्रशासकीय यंत्रणा योग्य रीतीने वापरली होती असेही सांगितले. अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाच्या प्राचार्या,डॉ. चव्हाण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रजेवरील अन्यायाविरुद्ध लढून नेहमीच लोकांचे कल्याण केले.  छत्रपती शिवाजी महाराज हे एक मराठा योद्धा आणि पश्चिम भारतातील मराठा साम्राज्याचे संस्थापक शासक होते. त्यांना अजूनही भारत आणि इतर देशांमध्ये त्यांच्या काळातील सर्वात महान योद्धा मानले जाते. ते एक लष्करी रणनीतीकार, कार्यक्षम प्रशासक आणि शूर योद्धा म्हणून ओळखले जातात.त्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन  मराठा साम्राज्याची स्थापना केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इतिहास विभाग प्रमुख डॉ. बी.के शेप तर आभार डॉ भीमानंद गजभारे यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....