इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

विद्यार्थ्यांनो संशोधक होण्यासाठी आपल्या ज्ञानाचा व्यासंग वाढवा - सुप्रसिद्ध  मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले

 


अंबाजोगाई (वसुदेव शिंदे):- विद्यार्थ्यांनी संशोधक होण्यासाठी आपल्या ज्ञानाचा व्यासंग वाढवला पाहिजे, त्या विषयातील खोली वाढवली पाहिजे आणि आपल्या बौद्धिक क्षमतेच्या कक्षा रूंदावल्या पाहिजेत तरच खऱ्या अर्थाने संशोधक म्हणून विद्यार्थी नांवारूपाला येतील असे प्रतिपादन सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ   डॉ.राजेश इंगोले यांनी केले. 


योगेश्वरी महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभाग यांच्या द्वारे आयोजित राष्ट्रीय पातळीवरील 'सूक्ष्म जीवांचा सभोवतालच्या परिस्थितीमध्ये समतोल राखण्यासाठी असलेली भूमिका' या अभ्यास परिषदेमध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष सी.एल.बर्दापूरकर, प्राचार्य एम.व्ही.कानेटकर, प्रा.अविनाश सोनवणे,उपप्राचार्यआर.व्ही.कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ.राजेश इंगोले यांनी विद्यार्थी हा उपजतच संशोधक असतो शिक्षकांनी त्याच्या ज्ञानात भर घालून त्याच्या ज्ञानाच्या कक्षा रूंदावल्या पाहिजेत. त्याला विषयाचे ज्ञान संपूर्णपणे दिले पाहिजे जेणेकरून त्या विषयाचा अभ्यास आणि त्या विषयातील बारकावे त्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आले पाहिजेत आणि त्या विषयाची गोडी निर्माण झाली तर आपोआपच विद्यार्थी विविध प्रकारचे संशोधन त्या विषयांमध्ये करू शकतात असे मत डॉ.राजेश इंगोले यांनी व्यक्त केले. आपण आत्मसात केलेल्या ज्ञानाचा आपल्या जीवनात उपयोग करून समाजाच्या दृष्टीने विधायक काम करीत राहणे हा बुद्धिमत्तेचा सरळ अर्थ आहे असे म्हणत विद्यार्थ्यांनी आपली बुद्धिमत्ता स्वतःच्या, समाजाच्या आणि राष्ट्राच्या हितासाठी वापरावी असे आवाहनही डॉ.राजेश इंगोले यांनी केले. यावेळी बोलताना अध्यक्ष सी.एल.बर्दापूरकर यांनी योगेश्वरी महाविद्यालयाने अनेक गुणवंत विद्यार्थी घडवले आहेत. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर योगेश्वरी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपला नांवलौकिक केलेला आहे. विद्यार्थ्यांनी सजग राहून आपल्याला त्या विषयांमधले काय येते आणि काय नाही याचा अभ्यास करून आपल्या शिक्षकांमार्फत त्या विषयामधले उत्तम ज्ञान घेण्याचा प्रयत्न करावा. आपल्या ज्ञानाचा समाजाच्या उन्नतीसाठी, राष्ट्र उभारणीसाठी प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी या परिषदेत सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच या परिषदेत आपले पेपर प्रकाशित करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या परिषदेत घेण्यात आलेल्या पोस्टर आणि संशोधन मॉडेल स्पर्धेत विजेत्या प्राप्त विद्यार्थ्यांनाही मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या परिषदेच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.एम.व्ही.कानेटकर, उपप्राचार्य डॉ.आर.व्ही.कुलकर्णी, डॉ.वाय.एस.हंडीबाग यांनी ही राष्ट्रीय पातळीवरील परिषद यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.ए.एस.कदम तर  उपस्थित पाहुण्यांचे आभार प्रदर्शन प्रा.डॉ.अनिल नरसिंगे यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या