इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

पुरुषांची नकारात्मक मानसिकता बदलणे गरजेचे - वसिमा शेख

अमोल जोशी / पाटोदा - आज प्रत्येक क्षेत्र महिलांनी पादाक्रांत करून आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. अधिकाधिक महिला आर्थिकदृष्टया सक्षम होत आहेत तरीही एक गृहिणी असो किंवा उच्चपदस्थ अधिकारी असो, महिलेच्या मनाचा अनादर केला जातो. घरात व घराबाहेरही महिलेच्या इच्छा आकांक्षांना डावलले जाते. तिच्या निर्णयांना पारिवारिक निर्णय प्रक्रियेत महत्व दिले जात नाही. स्त्रिला  भावनिक आधार देऊन तिच्या प्रगतीसाठी आवश्यक सहकार्य केल्यास तिचा आत्मविश्वास वाढतो. पुरुषप्रधान संस्कृतीत जोवर पुरुषाची साथ महिलेला मिळत नाही तोपर्यंत ती खऱ्या अर्थाने यशस्वी होणार नाही, म्हणून स्त्री पुरुष समानता प्रस्थापित करण्यासाठी पुरुषांची महिलांबद्दल असलेली पराकोटीची नकारात्मक मानसिकता आधी बदलणे गरजेचे आहे असे प्रतिपादन पाटोद्याच्या उपविभागीय दंडाधिकारी वसिमा शेख मॅडम यांनी केले. येथील नवगण शिक्षण संस्था संचालित वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.


महाविद्यालयाच्या महिला सक्षमीकरण समिती व अंतर्गत तक्रार निवारण कक्षाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रोफेसर आबासाहेब हांगे होते. व्यासपीठावर दुसऱ्या प्रमुख अतिथी म्हणून शहरातील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. कोमल राख, महिला सक्षमीकरण समिती अध्यक्ष प्रा. मनिषा गाढवे, प्रोफेसर अनिता धारासूरकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी सौ. केशरबाई क्षीरसागर व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पमाल्यार्पण मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी सर्व प्राध्यापिका व उपस्थित विद्यार्थिनीचा अतिथींच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.


आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉ. कोमल राख यांनी सर्व कर्तृत्ववान महिलांना वंदन करून महिलेचा जीवनपट स्पष्ट करणारी व तिचे योगदान सिद्ध करणारी 'ती मला म्हणते मी होऊन बघ' ही प्रेरणादायी कविता सादर केली.


अध्यक्षीय समारोपात प्राचार्य प्रोफेसर आबासाहेब हांगे म्हणाले की, समाजव्यवस्था परिवर्तनशील असते. सर्वांनी प्रथम आपल्या परिवारात स्त्रीला सन्मान देऊन प्रोत्साहन दिले तरच समाजव्यवस्था बदलेल.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मनिषा गाढवे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सोमनाथ लांडगे यांनी केले. आभारप्रदर्शन प्रो. अनिता धारासूरकर यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या