परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

ना.पंकजाताई मुंडे यांनी मानले केंद्र व राज्य सरकारचे आभार

 श्री क्षेञ मच्छिंद्रनाथ गड ते कानिफनाथ गड रोप-वे ला शासनाची मंजुरी

ना.पंकजाताई मुंडे यांनी मानले केंद्र व राज्य सरकारचे आभार


रोप-वे मुळे बीड-नगर जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला मिळणार चालना


बीड ।दिनांक २७।  

आष्टी तालुक्यातील श्री क्षेञ मच्छिंद्रनाथगड (मायंबा) ते पाथर्डी तालुक्यातील  श्री क्षेञ कानिफनाथगड (मढी) या दरम्यान ३.६ कि.मीच्या रोप-वे प्रकल्पाला राज्य सरकारने मान्यता देवून नाथ भक्तांना सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल राज्याच्या पर्यावरण,वातावरणीय बदल व पशूसंवर्धन मंञी ना.पंकजाताई मुंडे यांनी राज्य व केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.


या दोन्ही गडा दरम्यान रोप-वे सुरू करावा यासाठी पाथर्डीचे आमदार मोनिका राजळे यांनी वेळोवेळी पाठपुरावा व प्रयत्न केला होता, त्यांच्या पाठपुराव्या नंतर राज्याचे मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंञी नितीन गडकरी यांच्या सहकार्याने शासनाच्या "राष्ट्रीय रोप-वे कार्यक्रम पर्वतमाला" या अंतर्गत  मायंबा ते मढी या ३.६ किमीच्या हवाई अंतरामध्ये सदर रोप-वे सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

या प्रकल्पामुळे बीड-नगर जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला नवी दिशा मिळणार असुन ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या यामुळे वाढणार आहे. ग्रामीण भागातील लोकांना रोजगाराच्या नवीन संधी देखील यामुळे उपलब्ध होतील. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे दोन्ही जिल्ह्यातील पर्यटन आणि दळणवळण क्षेञाला चांगला फायदा होणार आहे. दरम्यान, हा रोप-वे सुरू करुन नाथ भक्तांना सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल ना. पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंञी नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!