प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

ना.पंकजाताई मुंडे यांनी मानले केंद्र व राज्य सरकारचे आभार

 श्री क्षेञ मच्छिंद्रनाथ गड ते कानिफनाथ गड रोप-वे ला शासनाची मंजुरी

ना.पंकजाताई मुंडे यांनी मानले केंद्र व राज्य सरकारचे आभार


रोप-वे मुळे बीड-नगर जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला मिळणार चालना


बीड ।दिनांक २७।  

आष्टी तालुक्यातील श्री क्षेञ मच्छिंद्रनाथगड (मायंबा) ते पाथर्डी तालुक्यातील  श्री क्षेञ कानिफनाथगड (मढी) या दरम्यान ३.६ कि.मीच्या रोप-वे प्रकल्पाला राज्य सरकारने मान्यता देवून नाथ भक्तांना सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल राज्याच्या पर्यावरण,वातावरणीय बदल व पशूसंवर्धन मंञी ना.पंकजाताई मुंडे यांनी राज्य व केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.


या दोन्ही गडा दरम्यान रोप-वे सुरू करावा यासाठी पाथर्डीचे आमदार मोनिका राजळे यांनी वेळोवेळी पाठपुरावा व प्रयत्न केला होता, त्यांच्या पाठपुराव्या नंतर राज्याचे मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंञी नितीन गडकरी यांच्या सहकार्याने शासनाच्या "राष्ट्रीय रोप-वे कार्यक्रम पर्वतमाला" या अंतर्गत  मायंबा ते मढी या ३.६ किमीच्या हवाई अंतरामध्ये सदर रोप-वे सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

या प्रकल्पामुळे बीड-नगर जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला नवी दिशा मिळणार असुन ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या यामुळे वाढणार आहे. ग्रामीण भागातील लोकांना रोजगाराच्या नवीन संधी देखील यामुळे उपलब्ध होतील. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे दोन्ही जिल्ह्यातील पर्यटन आणि दळणवळण क्षेञाला चांगला फायदा होणार आहे. दरम्यान, हा रोप-वे सुरू करुन नाथ भक्तांना सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल ना. पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंञी नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या