मोठ्या संख्येने उपस्थित रहा....

इमेज
द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आज आयोजन परळी वैजनाथ | प्रतिनिधी द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालय, परळी वैजनाथ यांच्या वतीने २० वे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे स्नेहसंमेलन आज  बुधवार, दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे  नटराज रंग मंदिर, परळी वैजनाथ येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामलिंग राजनळे सर (माजी मुख्याध्यापक, वैद्यनाथ विद्यालय) राहणार असून उद्घाटन  गणेश गिरी (गटशिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्र, परळी वै.) यांच्या हस्ते होणार आहे. या काकार्यक्रमास बाजीराव  भैय्या   धर्माधिकारी (माजी नगराध्यक्ष),  कोकणे  (विस्ताराधिकारी),  धनंजय ढोणे  (पोलीस निरीक्षक),  दिवाकर जोशी (गझलकार), प्रा. रविंद्र जोशी सर (पत्रकार,  दैनिक पुढारी),  व्यंकटेश शिंदे (नगरसेवक) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.           स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे नृत...

ना.पंकजाताई मुंडे यांनी मानले केंद्र व राज्य सरकारचे आभार

 श्री क्षेञ मच्छिंद्रनाथ गड ते कानिफनाथ गड रोप-वे ला शासनाची मंजुरी

ना.पंकजाताई मुंडे यांनी मानले केंद्र व राज्य सरकारचे आभार


रोप-वे मुळे बीड-नगर जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला मिळणार चालना


बीड ।दिनांक २७।  

आष्टी तालुक्यातील श्री क्षेञ मच्छिंद्रनाथगड (मायंबा) ते पाथर्डी तालुक्यातील  श्री क्षेञ कानिफनाथगड (मढी) या दरम्यान ३.६ कि.मीच्या रोप-वे प्रकल्पाला राज्य सरकारने मान्यता देवून नाथ भक्तांना सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल राज्याच्या पर्यावरण,वातावरणीय बदल व पशूसंवर्धन मंञी ना.पंकजाताई मुंडे यांनी राज्य व केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.


या दोन्ही गडा दरम्यान रोप-वे सुरू करावा यासाठी पाथर्डीचे आमदार मोनिका राजळे यांनी वेळोवेळी पाठपुरावा व प्रयत्न केला होता, त्यांच्या पाठपुराव्या नंतर राज्याचे मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंञी नितीन गडकरी यांच्या सहकार्याने शासनाच्या "राष्ट्रीय रोप-वे कार्यक्रम पर्वतमाला" या अंतर्गत  मायंबा ते मढी या ३.६ किमीच्या हवाई अंतरामध्ये सदर रोप-वे सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

या प्रकल्पामुळे बीड-नगर जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला नवी दिशा मिळणार असुन ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या यामुळे वाढणार आहे. ग्रामीण भागातील लोकांना रोजगाराच्या नवीन संधी देखील यामुळे उपलब्ध होतील. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे दोन्ही जिल्ह्यातील पर्यटन आणि दळणवळण क्षेञाला चांगला फायदा होणार आहे. दरम्यान, हा रोप-वे सुरू करुन नाथ भक्तांना सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल ना. पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंञी नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....