इमेज
  ग्लोबल विकास ट्रस्ट आणि परळी नगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम; पथनाट्यातून दिला वृक्षसंगोपनाचा संदेश परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंगोपनाचा प्रभावी संदेश देण्यासाठी परळी शहरात आज एका विशेष जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. ग्लोबल विकासच ट्रस्ट, नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक वृक्षसंवर्धन चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आज, शुक्रवार २६ जून रोजी शहरातील प्रमुख आणि गजबजलेल्या भागात या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये मोंढा मार्केट, बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि नेहरू चौक तळ परिसराचा समावेश होता. या पथनाट्याला परळीकरांनी प्रचंड गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नाट्यातून दिला 'झाडे लावा, झाडे जगवा'चा संदेश वाढते प्रदूषण आणि निसर्गाचा बिघडत चाललेला समतोल या पार्श्वभूमीवर मानवी जीवनात वृक्षांचे काय महत्त्व आहे, हे कलाकारांनी आपल्या प्रभावी अभिनयातून मांडले. केवळ झाडे लावणे पुरेसे नसून त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज कशी बनली आहे, यावर पथनाट्यातून प्रकाश टाकण्यात आला. पाणीटंचाई, ग्लोबल वॉर्मिंग आण...

 वाण धरणातील  व अंबलवाडी धरणातील पाणी नदीपात्रात सोडा-फुलचंद कराड

परळी वैजनाथ, (प्रतिनिधी)ः- परळी तालुक्यातील वाण धरणात पुरेसा पाणीसाठा आहे. वाण अंबलवाडी धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवून वाण नदीपात्रात सोडावे, जेणे करुन परिसरातील शेतकरी बांधवांच्या जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय होईल, प्रशासनाने लवकरात लवकर वाण धरणाचे पाणी नदीपात्रात सोडावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे जेष्ठ नेते तथा भगवान सेनेचे सरसेनापती व वाणधरण शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष फुलचंद  कराड यांनी केली आहे.

परळी तालुक्यातील नागापूर येथील वाण धरणाखालील व नदीपात्राच्या दोन्ही बाजुची कार्यक्षेत्रातील गावाच्या पिण्याच्या पाण्याचा सोर्स विहिरी नळयोजना नदीपात्रातून आहे. आता नदीपात्र आटले आहे. त्यामुळे विहिरीचे पाणी आटल्यामुळे अनेक गावांना पिण्याचे पाणी नाही, जनावरांनाही नदी शिवारात पाणी नाही, पाखरे पाण्यावाचून मरताहेत, मला गेल्या 4 दिवसात अनेक गावचे सरंच गावकरी भेटले आहेत. पाणी सोडण्यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी केली आहे. मी गेल्या 25 ते 30 वर्षापासून अखंडपणे हे काम दरवर्षी करत असतो व धरणातील पाणी नदीपात्रात सोडण्यासाठी पाठपुरावा करत असतो. येत्या 2 दिवसात शिष्टमंडळ घेवून बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक साहेबांना भेटणार आहे.

गुढीपाडव्यापासून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी करणार आहे. जेंव्हा श्री केंद्रेकर जिल्हाधिकारी होते. तेंव्हा आम्ही त्यांना भेटलो ते म्हणाले आमचे अधिकारी इंजि.ला घेऊन धरणावर येतो, पाहणी करतील मगच पाणी सोडले जाईल. आम्हाला न  सांगता गुप्तपणे श्री केंद्रेकर साहेबांनी पाठक साहेबांना धरणाची पाहणी करायला पाठवले. नंतरच पाणी सोडले. यंदा तर धरणात पाणी भरपूर आहे. धरण तुडूंब भरलेले आहे.अंबलवाडी, नागापूर, लिंबुटा, बहादूरवाडी, पांगरी, गावचे तांडे, सबदराबाद, नाथ्रा, तळेगाव, माळहिवरा, तडोळी, वडखेल, कौठळी, देशमुख टाकळी आदी गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. जनावरे, पाखरे यांचाही पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. दरवर्षी प्रमाणे याही पाणी सोडण्याबाबत प्रशासन आपल्या सहकार्य करतील अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे जेष्ठ नेते तथा भगवान सेनेचे सरसेनापती व वाणधरण शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष व मार्गदर्शक फुलचंदभाऊ कराड यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या