नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दिली माहिती..

इमेज
नीट परीक्षा 2026 साठीची नवीन अपडेट: 21 जूनला होणार परीक्षा नीट परीक्षा 2026 साठीची नवीन अपडेट राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीने जाहीर केली आहे.या अपडेट नुसार आता नीट परीक्षा 21 जून रविवार रोजी घेण्यात येणार आहे. या संदर्भातील माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीने आपल्या अधिकृत एक्स हॅण्डल वर दिली आहे. नीट परीक्षा 2026 तीन मे रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेपूर्वीच अनेक विद्यार्थ्यांच्या हाती या परीक्षेची प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर ही प्रश्नपत्रिका फुटली असल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले. त्यानुसार राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीने ही परीक्षा रद्द केले असल्याची घोषणा केली. देशातील 23 लाख हून अधिक विद्यार्थ्यांनी नीट 2026 ची परीक्षा दिली होती. आता अचानक ही परीक्षा रद्द झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्याचा मनस्ताप झाला. या परीक्षे संदर्भातील तपास नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सीबीआय कडे दिला. सीबीआयच्या तपासामध्ये राजस्थान मधील सिकर जिल्ह्यात त्याचबरोबर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, लातूर अणि पुणे या ठिकाणाहून या परीक्षेची संबंधित संशयितांना सीबीआयने अटक केली. त्यानंतर आज नॅशनल टीसी टेस्टिंग एजन्सीने 21 जून...

 आपापली जबाबदारी ओळखून सामाजिक व राष्ट्रीय एकात्मता टिकवा - मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले

अंबाजोगाई (वसुदेव शिंदे)...

समाजात एकिकडे सर्वत्र वणवा पेटून सर्व काही बेचिराख होत असताना दुसरीकडे एक माणूस म्हणून माझी काय भूमिका असली पाहिजे हे कळले तरच समाज एकत्रीत राहील अन्यथा सामाजिक, राष्ट्रीय एकात्मता भंग होईल असे मत डॉ.राजेश इंगोले यांनी व्यक्त केले.

येथील देशमुख कोचिंग क्लासेसच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात ते अध्यक्षीय स्थानावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजपचे प्रवक्ते गणेश हाके, ग्रामीण पोलिस स्टेशनचे निरीक्षक राम पडळकर, उद्योजक गणेश देशमुख, सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ.उद्धव शिंदे, आधार माणुसकी संस्थेचे ऍड.संतोष पवार, सरपंच शितल देशमुख, डॉ.प्रिया मुळे, प्राचार्य संजय देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलतांना डॉ.राजेश इंगोले यांनी गुणवंत हा केवळ ज्ञानाने किंवा उच्चशिक्षीत होऊन किंवा मोठ-मोठ्या पदव्या, नोकऱ्या घेऊन होत नाही. तर या सोबत त्याच्या व्यक्तिमत्वाला संस्कार आणि मानवी मूल्यांची जोड असावी लागते. शिक्षण आणि संस्कार या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्या पाहिजेत तरच मानवी संस्कार आणि मूल्य टिकतील. या कलियुगात वाढलेले अनाथाश्रम, वृद्धाश्रम, दुभंगलेली नाती याचे प्रमाण पाहिले तर मग सध्याच्या स्थितीत शिक्षणाने प्रगती झाली आहे. की, अधोगती हे कळायला वाव नाही. समाजात वाढलेली गुन्हेगारी, दिवसाढवळ्या होणारे बलात्कार, खून, चोऱ्या, दरोडे हे निश्चितच भूषणावह नाही. एकीकडे भारत महासता होण्याच्या वल्गणा होत असताना दुसरीकडे मात्र देशात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे, बेरोजगारांची संख्या वाढत आहे हा विरोधाभास आपल्याला लक्षात येत नाही का..? असा सवाल करीत आता समाजात होत असणाऱ्या अन्याय, अत्याचार याविरूद्ध सर्वसामान्य जनतेनेच पेटून उठले पाहिजे. समाजात हा वणवा पेटला असताना माझी भूमिका हा वणवा विझवणाऱ्याची असावी का पेटवणाऱ्याची हे उत्तरच या देशाला महासत्ता बनवू शकते. हा वणवा पेटला असतांना तुम्ही काय करीत होतात..? हा प्रश्न नक्कीच पुढची पिढी तुम्हाला विचारू शकते. त्यावेळी तुम्हाला त्यांना मी माझ्यापरीने हा वणवा विझविण्याचे प्रयत्न करीत होतो असे अभिमानाने सांगता आले पाहिजे असे सांगत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं मी प्रथम भारतीय आणि अंतिमतः भारतीयच ही प्रखर राष्ट्राभिमानी ओळ सदोदित हृदयात कोरून ठेवली पाहिजे असे आवाहन डॉ.राजेश इंगोले यांनी केले. यावेळी बोलताना भाजप प्रवक्ते गणेश हाके यांनी विद्यार्थ्यांनी सर्व महापुरूषांचे विचार आत्मसात करून त्याप्रमाणे चालले पाहिजे तसेच आपल्या मतापित्यांचा, गुरूजनांचा जेष्ठ श्रेष्ठ, महिलाभगिनींचा आदर बाळगून समाजात वावरले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्य संजय देशमुख यांनी ही संस्था शिक्षणासोबत संस्कार ज्ञानदान देण्याचे काम करीत आहे. शिक्षणाचे बाजारीकरण होत असताना ही संस्था गोरगरीब वंचित, शोषित समाजाच्या मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे, त्यांना गुणवंत, प्रज्ञावंत, शिलवंत बनवत आहे आणि याच मार्गावर चालत राहील असे आश्वासन दिले. याप्रसंगी डॉ.उद्धव शिंदे, ऍड.संतोष पवार, गणेश देशमुख, सरपंच शीतल देशमुख यांनी प्रसंगोचित मार्गदर्शन केले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना डॉ.राजेश इंगोले, गणेश हाके व इतर मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशील सूर्यवंशी यांनी केले. तर उपस्थितांचे आभार संस्थेच्या संचालिका सुचिता देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थेच्या सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या