इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

दुसरा धनंजय नागरगोजे होऊ द्यायचा नसेल तर... बीडमधील शिक्षकांचा आक्रोश, थेट सरकारलाच दिला इशारा

 बीड येथील शाहू फुले आंबेडकर आश्रम शाळेतील शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत आत्महत्या केली. नागरगोजे हे १८ वर्ष बिन-पगारी काम करत होते. त्यांच्या आत्महत्येनंतर महाराष्ट्रभर संतापाची लाट निर्माण झाली. दरम्यान पुन्हा धनंजय नागरगोजे होऊ द्यायचा नसेल तर आमच्या मागण्या पूर्ण करा असे म्हणत धनंजय नागरगोजे यांच्या सहकारी शिक्षकांनी आवाज उठवला आहे."धनंजय नागरगोजे ज्या संस्थेमध्ये कार्यरत होते, तेथे काम करणाऱ्या अन्य शिक्षकांनी रोष व्यक्त केला आहे. त्यांच्या आत्महत्या प्रकरणातील दोषी लोकांवर कारवाई करण्यासाठी विनाअनुदानित शिक्षत आक्रमक झाले आहेत. धनजंय नागरगोजे यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी. त्याशिवाय त्यांच्या पत्नीला नोकरीमध्ये समाविष्ट करावे अशी मागणी सहकारी शिक्षकांकडून केली जात आहे."

 '१८ वर्ष काम करुन घरी फुटकी कवडी देखील दिली नाही. लेकरा-बाळांना आम्ही काय उत्तर द्यायचं' असे म्हणत सहकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. शाहू फुले आंबेडकर निवासी अनुसूचित आश्रम शाळेला व्हि जे एन टीच्या धर्तीवर शंभर टक्के अनुदान देण्यात यावे अशी मागणी संतप्त शिक्षकांनी केली आहे.

शिक्षकांच्या वतीने २५ मार्च रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आम्ही उठणार नाही, आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ सरकारने येऊ देऊ नये, असे शिक्षकांनी म्हटले आहे. दरम्यान धनंजय नागरगोजे यांच्या आत्महत्या प्रकरणास सरकार आणि संस्थाचालक जबाबदार असल्याचे शिक्षकांनी सांगितले आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या