इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

दुसरा धनंजय नागरगोजे होऊ द्यायचा नसेल तर... बीडमधील शिक्षकांचा आक्रोश, थेट सरकारलाच दिला इशारा

 बीड येथील शाहू फुले आंबेडकर आश्रम शाळेतील शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत आत्महत्या केली. नागरगोजे हे १८ वर्ष बिन-पगारी काम करत होते. त्यांच्या आत्महत्येनंतर महाराष्ट्रभर संतापाची लाट निर्माण झाली. दरम्यान पुन्हा धनंजय नागरगोजे होऊ द्यायचा नसेल तर आमच्या मागण्या पूर्ण करा असे म्हणत धनंजय नागरगोजे यांच्या सहकारी शिक्षकांनी आवाज उठवला आहे."धनंजय नागरगोजे ज्या संस्थेमध्ये कार्यरत होते, तेथे काम करणाऱ्या अन्य शिक्षकांनी रोष व्यक्त केला आहे. त्यांच्या आत्महत्या प्रकरणातील दोषी लोकांवर कारवाई करण्यासाठी विनाअनुदानित शिक्षत आक्रमक झाले आहेत. धनजंय नागरगोजे यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी. त्याशिवाय त्यांच्या पत्नीला नोकरीमध्ये समाविष्ट करावे अशी मागणी सहकारी शिक्षकांकडून केली जात आहे."

 '१८ वर्ष काम करुन घरी फुटकी कवडी देखील दिली नाही. लेकरा-बाळांना आम्ही काय उत्तर द्यायचं' असे म्हणत सहकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. शाहू फुले आंबेडकर निवासी अनुसूचित आश्रम शाळेला व्हि जे एन टीच्या धर्तीवर शंभर टक्के अनुदान देण्यात यावे अशी मागणी संतप्त शिक्षकांनी केली आहे.

शिक्षकांच्या वतीने २५ मार्च रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आम्ही उठणार नाही, आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ सरकारने येऊ देऊ नये, असे शिक्षकांनी म्हटले आहे. दरम्यान धनंजय नागरगोजे यांच्या आत्महत्या प्रकरणास सरकार आणि संस्थाचालक जबाबदार असल्याचे शिक्षकांनी सांगितले आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!