प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

 गोदावरी पात्रात जायकवाडी धरणाचे पाणी सोडण्यात यावे - अनिल बोर्डे

  गेवराई :- गोदावरी पात्रात जायकवाडी धरणाचे पाणी सोडण्यात यावे . सध्या राक्षसभुवन व शहागड येथील पात्र कोरडे झाले आहे सध्या मार्च संपत असून एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई भासणार आहे तसेच शनि अमावस्या असल्यामुळे  राक्षसभुवन येथे महाराष्ट्रातून प्रचंड गर्दी होणार आहे त्यासाठी जायकवाडी धरणातून गोदावरी पात्रात पाणी सोडणे आवश्यक आहे अशी मागणी  मा. संचालक गोदावरी महामंडळ संभाजीनगर, जिल्हाधिकारी बीड, कार्यकारी अभियंता जलनिसारण विभाग क्रमांक  3 बीड तहसीलदार गेवराई यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून बीड जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र उपाध्यक्ष अनिल बोर्डे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. 

       सध्या राक्षसभुवन व शहागड येथील गोदावरी पात्र कोरडे पडत आहे. सध्या मार्च महिना संपत आला असून उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. एप्रिल/ मे मध्ये तीव्रता दिसून येणार आहे. राक्षसभुवन येथे महाराष्ट्रातील भाविक शनि अमावस्या निमित्त प्रचंड गर्दी होणार आहे. तसेच पिण्यासाठी व जनावरे इत्यादीसाठी पाणी पुष्कळ प्रमाणात असणे गरजेचे आहे.  पाण्याची मोठी समस्या मोठी समस्या  निर्माण होत असल्यामुळे या भागातील जलस्रोत पातळी खालावली असल्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन जायकवाडी धरणातून पाणी तात्काळ गोदावरी पात्रात सोडणे आवश्यक आहे तरी याबाबत विचारविनिमय करून युद्ध पातळीवर गोदावरी पात्रात पाणी सोडण्यात यावे त्यामुळे गोदावरी नदीच्या सर्व गावांना उन्हाळ्याच्या तीव्रतेमध्ये दिलासा मिळेल याबाबत तात्काळ  कार्यवाही करून सहकार्य करावे अशी विनंती बीड जिल्हा ग्राहक पंचायत उपाध्यक्ष अनिल बोर्डे व गेवराई ग्राहक पंचायत अध्यक्ष प्रा. भानुदास फलके यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या