परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

 गोदावरी पात्रात जायकवाडी धरणाचे पाणी सोडण्यात यावे - अनिल बोर्डे

  गेवराई :- गोदावरी पात्रात जायकवाडी धरणाचे पाणी सोडण्यात यावे . सध्या राक्षसभुवन व शहागड येथील पात्र कोरडे झाले आहे सध्या मार्च संपत असून एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई भासणार आहे तसेच शनि अमावस्या असल्यामुळे  राक्षसभुवन येथे महाराष्ट्रातून प्रचंड गर्दी होणार आहे त्यासाठी जायकवाडी धरणातून गोदावरी पात्रात पाणी सोडणे आवश्यक आहे अशी मागणी  मा. संचालक गोदावरी महामंडळ संभाजीनगर, जिल्हाधिकारी बीड, कार्यकारी अभियंता जलनिसारण विभाग क्रमांक  3 बीड तहसीलदार गेवराई यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून बीड जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र उपाध्यक्ष अनिल बोर्डे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. 

       सध्या राक्षसभुवन व शहागड येथील गोदावरी पात्र कोरडे पडत आहे. सध्या मार्च महिना संपत आला असून उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. एप्रिल/ मे मध्ये तीव्रता दिसून येणार आहे. राक्षसभुवन येथे महाराष्ट्रातील भाविक शनि अमावस्या निमित्त प्रचंड गर्दी होणार आहे. तसेच पिण्यासाठी व जनावरे इत्यादीसाठी पाणी पुष्कळ प्रमाणात असणे गरजेचे आहे.  पाण्याची मोठी समस्या मोठी समस्या  निर्माण होत असल्यामुळे या भागातील जलस्रोत पातळी खालावली असल्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन जायकवाडी धरणातून पाणी तात्काळ गोदावरी पात्रात सोडणे आवश्यक आहे तरी याबाबत विचारविनिमय करून युद्ध पातळीवर गोदावरी पात्रात पाणी सोडण्यात यावे त्यामुळे गोदावरी नदीच्या सर्व गावांना उन्हाळ्याच्या तीव्रतेमध्ये दिलासा मिळेल याबाबत तात्काळ  कार्यवाही करून सहकार्य करावे अशी विनंती बीड जिल्हा ग्राहक पंचायत उपाध्यक्ष अनिल बोर्डे व गेवराई ग्राहक पंचायत अध्यक्ष प्रा. भानुदास फलके यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!