प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

 संगीत साधना मंचची संगीत सभा उत्साहात

अंबाजोगाई -(वसुदेव शिंदे):-

संगीत साधना मंचच्या वतीने मराठवाड्यातील  गायिका सध्या पुणे  स्थित स्वरेशा पोरे  (कुलकर्णी) यांची गायन सभा खोलेश्वर महविद्यालयात गोपीनाथ मुंडे सभागृहात उत्साहात संपन्न झाली.

 दुसऱ्या प्रहरात संपन्न झालेल्या समय चक्रा नुसार राग ऐकण्याची या सभेत सुरुवातीला स्वरेशा पोरे यांनी सकाळच्या दुसऱ्या प्रहरातील राग नटभैरव विलंबित एकतालातील, समझत नही या बंदिशीने  आपल्या गायनाची सुरुवात केली

 यानंतर नाचत नटराज या द्रुत तीन तालातील बंदीशीने रसिकांची मने वेधून घेतली .

 यानंतर स्वरेशा पोरे  यांनी पंडित सी. आर.व्यास रचित राग बिलासखानी तोडी  मधील "त्यज रे अभिमान,जान गुनियन सो ' ही सर्व परिचय बंदिश सादर केली.  यानंतर दृत एकतलातील "जागत तोरे कारण बलमा  अनोखी बंदी सादर केली या बंदीची वैशिष्ट्य म्हणजे, अस्थाई एक तालाच्या वजनाने जात होती आणि अंतरा मात्र तिनतालाच्या वजनाने जाऊन परत एकदा एक तालाच्या वजनाला भिडत होता., ही तालाची समज,  रसिकांना सौ.स्वरेशा पोरे यांनी समजावून सांगितली आणि लिलाया करूनही दाखवली.

  यानंतर प्राणेश पोरे रचित "गिनत हारे ' या अर्थपूर्ण आणि अप्रतिम बंदिशीने, समस्त रसिकांच्या मनाचा ठाव घेतला.यानंतर समर्थ रामदास रचित "तानी स्वर रंगवावा 'या अभंगाने संगीत सभेची सांगता झाली.

संवादिनीवर विश्वजीत धाट तर तबल्यावर रत्नदीप शिगे यांनी  साथसंगत केली. सभेच्या रंजकतेचा चढता आलेख उपस्थित रसिकांनी अनुभवला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या