इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••
शाहु, फुले, आंबेडकर, आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा आंदोलनाचा इशारा



शाहू फुले आंबेडकर १६५ अनुसूचित जातीच्या आश्रम शाळांना VJNT शाळासहिंता लागू करून नियमित वेतनश्रेणी प्रमाणे १०० टक्के अनुदान देऊन शिक्षकांच्या होणाऱ्या आत्महत्या थांबवणे बाबत. 21 मार्च शुक्रवार रोजी शाहू फुले आंबेडकर,अनु.जाती आश्रमशाळा शिक्षक शिक्षकेत्तर संघटना महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्ह्याच्या वतीने सामाजिक न्याय मंत्री यांना जिल्हाधिकारी सोलापूर समाज कल्याण सोलापूर यांच्यामार्फत संघटनेकडून निवेदन देण्यात आले.

      शाहु, फुले, आंबेडकर १६५ आश्रमशाळा योजनेत असलेल्या बीड जिल्ह्यातील केळगाव येथील आश्रम शाळेतील शिक्षक धनंजय नागरगोजे सरांनी १८ वर्षापासून वेतन नसल्याने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. नागरगोजे सरांना श्रद्धांजली. मृत शिक्षकांच्या कुटुंबाला रू.१०,००,०००/-(दहा लाख रूपये) ची आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी केली आहे.शासनाकडून या शाळांना न्याय मिळावा अशी भावना ययेथे व्यक्त करत आहे गेल्या अनेक वर्षापासून शाहू फुले आंबेडकर १६५ निवासी आश्रमशाळा गोरगरिबांची मुले शिक्षण घेतात.अनेक वर्षांपासून या शाळांना न्याय मिळत नाही मात्र १०० टक्के प्रमाणे वेतनश्रेणी नुसार अनुदान मिळावे VJNT च्या आश्रमशाळा संहिता लागू करून कर्मचाऱ्याना सेवा सातत्य मिळावे,अशी मागणी कर्मचारी संघटनेची आहे.महाराष्टातील १६५ आश्रम शाळेच्या आमच्या सखोल तपासण्या झाल्या यातील अनेक शाळा पात्र होऊन देखील, शासनाकडून दखल घेतली जात नाही.

      तसेच शाहू, फुले आंबेडकर,आश्रमशाळा कर्मचारी संघटनेतर्फे५८ दिवस मुंबई आझाद मैदान येथे आमरण उपोषण होऊन देखील न्याय मिळत नाही. फार मोठी शोकांतिका आहे, जर अनुदान मिळाले नाही, तर अशा किती आत्महत्या होतील? सांगता येत नाही, अनुदान न मिळाल्यामुळे शिक्षकांच्या पदरी निराशाच आली आहे. एका बाजुला अनुदान नाही दुसरीकडे कुटुंबांचा खर्च भागविणे अवघड चालले आहे.

त्यामुळे आश्रमशाळेतील कर्मचारी चिंताग्रस्त,निराशमय जीवन जगत आहे याच निराशेतून धनंजय नागरगोजे या शिक्षकांनी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचललेले आहे सरकारने जर आश्रमशाळांना अनुदान दिले असते तर नागरगोजे सरांचा जीव वाचला असता.सरकारला अजून किती कर्मचाऱ्यांचा बळी घ्यायचा आहे असा संतप्त सवाल शाहू फुले आंबेडकर आश्रम शाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महाराष्ट्र राज्य सदस्य श्री.गणेश साखरे सर ,सोलापूर जिल्हा संघटना अध्यक्ष श्री.अनिल गेजगे सर, उपाध्यक्ष दादासो बेहरे सर, श्री नामदेव कुंभार सर,सभासद श्री.प्रभू शेळके सर यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!