दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

आज समारोप

 गुरुचरित्र हा वेदतुल्य ग्रंथ: परळी वैजनाथ ही स्वामी नृसिंह सरस्वती महाराजांची साधनास्थळी- प.पू.मकरंद महाराज

 परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

      स्वामी नृसिंह सरस्वती महाराज हे दत्तात्रयाचे दुसरे अवतार म्हणून प्रसिद्ध आहेत. परळी वैजनाथ क्षेत्रात त्यांनी काही काळ वास्तव्य केले. आंबा आरोग्य भवानीच्या सानिध्यात त्यांनी साधना केली. त्याचबरोबर दैवी लीलाही केल्या. याचे वर्णन गुरुचरित्र ग्रंथात आले आहे. यामुळे या स्थानाचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे दत्तधाम परभणीचे पिठाधिपती प.पू. मकरंद महाराज यांनी सांगितले.

       वैजनाथ देवस्थान ट्रस्ट व गुरुतत्त्व प्रदीप यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या दोन दिवसापासून परळी येथे दासगणू महाराज रचित गुरुचरित्र सारामृत पारायण सोहळा मोठ्या उत्साहात सुरू आहे. या सोहळ्यात सायंकाळच्या सत्रात परभणीच्या दत्तधाम चे पिठाधिपती प. पू. मकरंद महाराज यांचे गुरुचरित्रावरील कथामृत भाविक श्रोत्यांना ऐकायला मिळत आहे. गुरुचरित्राच्या विविध पैलूंवर अतिशय भावपूर्ण विवेचन प.पू. महाराजांच्या मुखारविंदातून  हे कथामृत श्रोत्यांना मिळत आहे. आजच्या तिसऱ्या दिवशीच्या कथेत महाराजांनी परम पूज्य स्वामी नृसिंह सरस्वती महाराज हे साधारणतःइ.स. १४२०: महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील परळी-वैजनाथ येथे वास्तव्य असल्याचे सांगितले. त्याचबरोबर आंबा आरोग्य भवानीच्या सानिध्यात त्यांनी केलेल्या साधनेच्या आणि दैवी लीलांचे वर्णन त्यांनी केले. त्यानंतर गुरु शिष्य संवादातून विविध अध्यात्मिक प्रश्नांवर सविस्तर विवेचन केले. या कथामृत सोहळ्याला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

 आज समारोप 

       दरम्यान गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या या पारायण व कथामृत सोहळ्याचा आज समारोप होणार असून समारोप प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट व गुरुतत्त्व प्रदीप यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....