इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...

रोहिण्याच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांना आणणार

 मुख्यमंत्री आपल्यासोबत, त्यामुळे येत्या काळात बीड जिल्हा नक्कीच सुजलाम् सुफलाम् होईल

मुख्यमंत्र्यांनी श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड दत्तक घ्यावा - ना. पंकजाताई मुंडेंनी व्यक्त केली इच्छा


घाटशीळ पारगांवच्या फिरत्या नारळी सप्ताहात भाविकांची अलोट गर्दी


बीड।दिनांक १९। 

श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाच्या विकासा करिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पूर्वीपासूनच खूप सहकार्य लाभले आहे, मी पालकमंत्री असताना त्यांच्या सहकार्यामुळेच इथली कामे करू शकले. मुख्यमंत्र्यांनी आता हा गड दत्तक घ्यावा, अशी अपेक्षा  राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री आपल्या सोबत आहेत, त्यामुळे येत्या काळात बीड जिल्हा नक्कीच सुफलाम् सुफलाम होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 


  शिरूर कासार तालुक्यातील घाटशीळ पारगाव येथे श्री संत वामनभाऊ महाराज यांचा ९३ वा नारळी सप्ताहाची सांगता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ना. पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत मोठया उत्साहात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी मठाधिपती विठ्ठल बाबा महाराज, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी, आ. सुरेश धस, आ. नमिता मुंदडा, आ. मोनिका राजळे, माजी आमदार जयदत्त क्षीरसागर, माजी आमदार भीमराव धोंडे, सरपंच नवनाथ खेडकर आदी  उपस्थित होते.


   पुढे बोलतांना ना. पंकजाताई म्हणाल्या, हा जिल्हा दुष्काळी आहे, इथल्या लोकांना सन्मार्ग आणि भक्ती मार्गाकडे नेण्यासाठी संत वामनभाऊ, संत भगवान बाबा यांनी नारळी सप्ताहाची परंपरा सुरू केली. ही परंपरा थोर आहे, ती आजही अखंडपणे सुरू आहे. त्यामुळे या भागातील लोकांना आध्यात्मिक गोडी निर्माण झाली आहे.  गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी तसेच बीड जिल्ह्याच्या सर्वागीण विकासासाठी मुख्यमंत्री महोदय आपल्यासोबत आहेत, सत्तेशिवाय विकास होवू शकत नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हा गड दत्तक घ्यावा. गड दत्तक घेणे म्हणजे इथे येणाऱ्या प्रत्येकाचा विकास करणे आहे, त्यामुळे येत्या काळात जिल्हा सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही.


मुंडे साहेबांचे नाव कधीही कमी होऊ देणार नाही

--------

मी राजकारणात आले त्यावेळी लोकनेते मुंडे साहेबांनी मला या गडावर आणले होते, एक दोन वेळा मला अडचणीमुळे गडावर येता आले नव्हते पण दरवर्षी मी गडावर एक भक्त म्हणून आवर्जून येते. गडाच्या विकासाकरिता सातत्याने प्रयत्न केले. मुंडे साहेबांचे संस्कार असल्याने सर्व सामान्यांसाठी तसेच समाजातील सर्व घटकांसाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे व पुढेही राहिल. मुंडे साहेबांचे नाव मी कधीही कमी होऊ देणार नाही, असंच काम माझ्या हातून होईल असं ना. पंकजाताई मुंडे यावेळी म्हणाल्या.

रोहिण्याच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांना आणणार

-------

लातूर जिल्हयात रोहिणा (ता. चाकूर) येथे ग्रामस्थांनी लोक वर्गणीतून लोकनेते मुंडे साहेबांचे मंदिर बांधले आहे, त्याचा कलशारोहण आज माझ्या हस्ते होता पण मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यामुळे मला तिकडे जाता आले नाही. तिथले लोकं खूप नाराज झाले, त्यांना मी शब्द दिलाय की मुख्यमंत्र्यांना घेऊनच तुमच्या कार्यक्रमाला येईल त्यामुळं आपण तो शब्द पाळावा आणि पुढच्या वेळी कार्यक्रमाला यावे असे ना. पंकजाताई म्हणाल्या.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....