इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...
सामाजिक जाणिवेचा दृढ संकल्प: वडिलांच्या पुण्यस्मरनार्थ गावातील प्रत्येक कन्या विवाहासाठी देणार १० हजार रु.अर्थिक सहयोग!
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
    आपल्या वडिलांचा राजकीय, सामाजिक, धार्मिक वसा जपत आपल्या वडिलांच्या पुण्यस्मरनार्थ गावातील प्रत्येक कन्या विवाहासाठी १० हजार रु.अर्थिक सहयोग देण्याचा दृढ संकल्प मुलांनी केला आहे.अवास्तव आणि सवंग खर्चिक उपक्रमांपेक्षा सामाजिक जाणिवेचा दृढ संकल्प टोकवाडी येथील मुंडे बंधुंनी राबविणार असल्याचे जाहीर केले आहे.
       परळी परिसरातील नामांकित व विविध सामाजिक उपक्रमात संपुर्ण आयुष्यभर अग्रेसर राहिलेल्या टोकवाडीचे माजी सरपंच स्व. दशरथ ग्यानबा मुंडे (आबा) यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम १ एप्रिल २०२५ रोजी संपन्न झाला.या निमित्ताने ह.भ.प. विशाल महाराज खोले यांचे दुपारी तसेच रात्रौ गुरुवर्य ह.भ.प.गोपाळ महाराज वास्कर यांचे किर्तन झाले.या कार्यक्रमास नामवंत गायक,वादक, भजनी मंडळ सहभागी झाले. आप्तेष्ट, नातेवाईक, हितचिंतक व स्व.दशरथ आबा यांचे स्नेही, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ सामाजिक उपक्रम राबविण्याचा मनोदय नवनाथ दशरथ मुंडे व गणेश दशरथ मुंडे यांनी व्यक्त केला. सामाजिक जाणीवेचा उपक्रम आयुष्यभर राबविण्याचा निर्धार त्यांनी केला.या अनुषंगाने कन्यादानाला सहयोग देण्याचा पुण्यप्रद संकल्प करुन किर्तनकार महाराजांनी नवनाथ व गणेश यांनी गावातील प्रत्येक कन्या विवाहासाठी १० हजार रु.अर्थिक सहयोग देण्याचा दृढ संकल्प केल्याचे जाहीर केले. या सामाजिक जाणीवेच्या उपक्रमाचे उपस्थितांनी टाळ्याच्या गजरात कौतुक केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या