दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

 महिला महाविद्यालयात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी 



परळी वैजनाथ दि.१४ (प्रतिनिधी)


    येथील कै .लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात आज दि . १४ एप्रिल  रोजी विश्वरत्न , महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .

               या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव  रवींद्र देशमुख उपस्थित होते तर कोषाध्यक्ष प्रा . प्रसाद देशमुख हे प्रमुख व्याख्याते म्हणून लाभले . संस्थेच्या संचालिका सौ छायाताई देशमुख तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ . विद्याताई देशपांडे यांचीही विशेष उपस्थिती होती .

                मान्यवरांच्या शुभहस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला  पुष्पहार अर्पण केल्यानंतर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ . विद्याताई देशपांडे यांनी प्रास्ताविक केले . त्यांत त्यांनी  डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या  विविध क्षेत्रातील कार्याचा सार्थ

आढावा घेतला .

     प्रमुख व्याख्याते प्रा . प्रसाद देशमुख यांनी *उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे -* या उक्तीची यथार्थता आपल्या वक्तव्यातून सिद्ध केली .  संपादन केलेल्या ज्ञानाचा उपयोग दलित दुःखित पीडित , शोषित यांच्या उद्धारासाठीच करणे हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते असे त्यांनी प्रतिपादन केले . यासोबतच चवदार तळे , काळाराम मंदिर सत्याग्रह या सह अनेक अस्पृश्यता निवारण करणाऱ्या संघर्ष कार्याचाही आढावा घेतला .

अध्यक्षीय समारोप करताना आपल्या काव्यमय शैलीत -


मनात न ठेवता कुठलीही आढी ।उत्साहाने घडविली साक्षरतेची पिढी ॥ 

शिक्षणाच्या माध्यमातून देशाला दिला उत्तम आकार ।

आज त्यांचे स्वप्न खऱ्या अर्थाने झाले साकार ॥


देशाच्या उन्नतीसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड परिश्रम घेतले .आपल्या कठोर परिश्रमातून देशाला एक सार्थ सर्वसमावेशक अशी घटना दिली हे त्यांचे अत्यंत महनीय कार्य आहे . असे विचार  कार्यक्रमाचे अध्यक्ष रविंद्र देशमुख यांनी अध्यक्षीय समारोपात  मांडले . .

          या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  प्रा.डॉ.पी. व्ही. गुट्टे यांनी केले तर प्रा.डॉ.एस.व्ही. कचरे यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी डॉ . अरुण चव्हाण  डॉ. विलास देशपांडे  डॉ . विद्या गुळभिले डॉ रागिणी पाध्ये  डॉ .रंजना शहाणे डॉ . वर्षा मुंडे   प्रा. प्रवीण फुटके '  प्रा. प्रवीण नव्हाडे , श्री अनिल पत्की श्री सुहास कण्व श्री एन. जी.फुलारी  श्री विकास देशपांडे  आदींची उपस्थिती होती .  महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी वर्गही  उपस्थित होता .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....