इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

जालना:अकोल्यात आगीची झळ पोहोचलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा !


पालकमंत्री ना.पंकजा मुंडे यांचे जिल्हा प्रशासनाला आदेश ; आगीच्या घटनेची माहिती जाणून घेत व्यक्त केल्या संवेदना


जालना ।दिनांक १०।

अकोला  (ता. बदनापूर) गावातील मठवाडी परिसरात आज दुपारी अचानक लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या धान्य पिकांचे तसेच जखमी पशूंचे तातडीने पंचनामे करून संबंधित शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी असे आदेश राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी दिले आहेत. या घटनेची संपूर्ण माहिती जाणून घेत पालकमंत्र्यांनी या घटनेविषयी हळहळ व्यक्त केली आहे.


   अकोला गावातील गट क्रमांक ४१ मधील मठवाडी परिसरात आज दुपारी पोलवरील विजेच्या  तारांचे घर्षण होऊन अचानक आग लागली. या आगीमुळे शेतातील गहू, हरभरा, तूर या धान्याचे तसेच चारा, गाडी बैल, पशू खाद्य, मोटर पाईपलाईन याचे मोठे नुकसान झाले. शेतात असलेली काही जनावरे देखील आगीत होरपळली.  आग लागल्याचे कळताच  तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या आल्या आणि आग आटोक्यात आणण्यात यश आले.


पालकमंत्र्यांनी घेतली दखल

-------------

पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, बदनापूरच्या तहसीलदार आश्विनी डमरे यांच्याकडून आगीच्या घटनेची माहिती जाणून घेतली आणि झळ पोहोचलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे दिले आहेत. आगीत होरपळलेल्या जखमी पशूंवर तातडीने उपचार करण्यासही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, या घटनेबाबत आणि शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबद्दल ना. पंकजाताई मुंडे यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या