दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

जालना:अकोल्यात आगीची झळ पोहोचलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा !


पालकमंत्री ना.पंकजा मुंडे यांचे जिल्हा प्रशासनाला आदेश ; आगीच्या घटनेची माहिती जाणून घेत व्यक्त केल्या संवेदना


जालना ।दिनांक १०।

अकोला  (ता. बदनापूर) गावातील मठवाडी परिसरात आज दुपारी अचानक लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या धान्य पिकांचे तसेच जखमी पशूंचे तातडीने पंचनामे करून संबंधित शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी असे आदेश राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी दिले आहेत. या घटनेची संपूर्ण माहिती जाणून घेत पालकमंत्र्यांनी या घटनेविषयी हळहळ व्यक्त केली आहे.


   अकोला गावातील गट क्रमांक ४१ मधील मठवाडी परिसरात आज दुपारी पोलवरील विजेच्या  तारांचे घर्षण होऊन अचानक आग लागली. या आगीमुळे शेतातील गहू, हरभरा, तूर या धान्याचे तसेच चारा, गाडी बैल, पशू खाद्य, मोटर पाईपलाईन याचे मोठे नुकसान झाले. शेतात असलेली काही जनावरे देखील आगीत होरपळली.  आग लागल्याचे कळताच  तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या आल्या आणि आग आटोक्यात आणण्यात यश आले.


पालकमंत्र्यांनी घेतली दखल

-------------

पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, बदनापूरच्या तहसीलदार आश्विनी डमरे यांच्याकडून आगीच्या घटनेची माहिती जाणून घेतली आणि झळ पोहोचलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे दिले आहेत. आगीत होरपळलेल्या जखमी पशूंवर तातडीने उपचार करण्यासही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, या घटनेबाबत आणि शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबद्दल ना. पंकजाताई मुंडे यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....