इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...

 परळीत विजेचा अखंडित खोळंबा: खासदारांच्या कार्यक्रमातही वीज गुल; नागरिकांतील संतापाच्या भावनांची दखल घ्या - ॲड. जीवन देशमुख 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)

     परळीतील महावितरणाचा ठरलेला  नेहमीचा सिरस्ता सुरुच आहे. शहरात रात्रंदिवस विजेचा लपंडाव सुरू आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे खासदार स्वतः परळीत असतांना भर कार्यक्रमात ही वीज खंडित झाली. एवढा गलथानपणा सुरु असुन याची संबंधितांनी दखल घ्यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष ॲड. जीवन देशमुख यांनी दिला आहे.

    वीजवितरण कंपनीने मात्र नेहमीप्रमाणेच  आपला गलथान कारभार  सुरूच ठेवलेला आहे.भर उन्हाळा सुरु झाला तसा विजेचा लपंडावही सुरू झाला आहे. असंख्य वेळा नागरिकांनी आमच्या भागातील वीजपुरवठा  सुरळीत चालू ठेवावा, विविध ठिकाणी असलेल्या त्रुटी दूर कराव्यात, वीजपुरवठा सुरळीत चालू ठेवावा अशी वारंवार मागणी केली पण याची दखल वीजवितरण कंपनीने घेतलेली नाही.याचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वीजवितरण कंपनीच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.विशेष म्हणजे खासदार स्वतः परळीत असतांना भर कार्यक्रमात ही वीज खंडित झाली.यामुळेही संताप व्यक्त होत आहे.

     शहरातील वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष ॲड. जीवन देशमुख यांनी दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....